Ratnagiri News : रत्नागिरीतील सगळे पर्यटक सुरक्षित; जिल्हा नियंत्रण कक्षातून सगळ्यांना संपर्क
पहलगाम काश्मीर येथे पर्यटनासाठी गेलेल्या जिल्ह्यातील सुमारे पर्यटकांशी संपर्क झाला आहे. हे सगळे पर्यटक सुखरुप व सुरक्षित आहेत. जिल्हा प्रशासन त्यांच्या संपर्कात असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली.हातखंबा येथील श्री टुरिझम मधील ३४, अमृता ट्रॅव्हल्स सहा, रत्नागिरी परिसरातील ६ पर्यटकांजवळ संपर्क झाला असून ते सगळे सुखरूप असल्याची माहिती आहे.
