Sushma Andhare on PM Modi About Pahalgam Attack : पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने देशभरात खळबळ उडाली असून २६ निष्पाप लोकांचा जीव गेला आहे. या हल्ल्यामुळे अमरनाथ यात्रेच्या भक्तांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या हल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. मोदी परदेश दौऱ्यावर असतानाच हा हल्ला कसा होतो, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
मोदी फोनवरून कसे संपर्कात, अमित शहा कसे पोहोचले हे पुन्हापुन्हा रिवाइंड करून दाखवण्यापेक्षा, तिथे सुरक्षितता का नव्हती? आतंकवादी एवढ्या आत पोहोचेपर्यंत सुरक्षामंत्रालय काय करत होतं? पुलवामा आणि आता पहलगाम, नेमके हल्ल्याच्या वेळीच मोदीजी देशाबाहेर कसे असतात? हेही प्रश्न विचारा ना? असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे. सुषमा अंधारेंनी आपल्या एक्स अकाऊंटवर पोस्ट केली आहे.
मोदी फोनवरून कसे संपर्कात, अमित शहा कसे पोहोचले हे पुन्हापुन्हा रिवाइंड करून दाखवण्यापेक्षा, तेथे सुरक्षितता का नव्हती? आतंकवादी एवढ्या आत पोहोचेपर्यंत सुरक्षामंत्रालय काय करत होतं?
पुलवामा & आता पहेलगाम, नेमके हल्ल्याच्या वेळीच मोदीजी देशाबाहेर कसे असतात? हेही प्रश्न विचारा ना
— SushmaTai Andhare (@andharesushama) April 22, 2025
Pahalgam Terror Attack: मुस्लिम नाहीए, घाला गोळ्या! नावं विचारुन दहशतवाद्यांचा हल्ला; प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं?
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परदेश दौऱ्यावर होते, मंगळवारी २२ एप्रिलला हा हल्ला झाला होता. तेव्हा मोदी सौदी अरेबियलामध्ये होते. हल्ल्याची माहिती समजताच ते माघारी परतले आहेत. याच मुद्द्यावरून सुषमा अंधारे यांनी थेट पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे. पुलवामा हल्ल्याचा उल्लेख करत नरेंद्र मोदी आताही पहलगाममध्ये हल्ला झाल्यावर परदेशात कसे असेही प्रश्न विचारा असं सुषमा अंधारेंचं म्हणणं आहे.
दरम्यान, सौदी अरेबिया आणि यथील भारतीय समुदायाच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. उभय देशांतील संबंध वृद्धिंगत करण्यासाठी युवराज महंमद बिन सलमान यांच्याशी मोदी चर्चा करणार होते. मात्र, रात्री झालेल्या घडामोडींनंतर मोदी भारतात परतले.

