UPSC Success Story: यूपीएससीचा २०२४ नागरी सेवा परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये नाशिकच्या गौरव कायंदे पाटील, अक्षय पवार आणि राजू वाघ यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर यशाला गवसणी घातली आहे.
या तिघांच्या संघर्षमय प्रवासाने नाशिकच्या तरुणांना प्रेरणा मिळाली आहे. शेतकरीपुत्र अक्षय चमकला सिन्नर तालुक्यातील धोंडवीरनगर येथील दीड एकर कोरडवाहू जमीन आणि दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या कुटुंबातून आलेल्या अक्षय पवारने खडतर परिस्थितीवर मात करीत ‘यूपीएससी’त ६०४ वा क्रमांक पटकावला. वडील विलास पवार यांच्या कष्टांची जाणीव ठेवत वयाच्या २२ व्या वर्षी अक्षयने स्पर्धा परीक्षांचा श्रीगणेशा केला. सिन्नरमध्येच प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण करून नाशिकच्या केटीएचएम महाविद्यालयातून बी. एस्सी केल्यानंतर त्याने ‘यूपीएससी’ ची तयारी सुरु केली. पहिल्याच प्रयत्नात पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाल्याने त्याचा आत्मविश्वास वाढला.
ऑटोचालकाच्या लेकीनं यूपीएससीत मारली बाजी; यवतमाळची आदिबा अहमद बनली महाराष्ट्रातील पहिली मुस्लिम महिला IAS
२०२२ मध्ये इंटेलिजन्स ब्यूरोची (गुप्तचर खाते) परीक्षा उत्तीर्ण करीत तो पंतप्रधान कार्यालयात कॅबिनेट सेक्रेटरी म्हणून दिल्लीत रुजू झाला. पण, या यशावर थांबण्याऐवजी त्याने ‘यूपीएससी’चा ध्यास कायम ठेवला. चार वर्षांच्या अथक मेहनतीनंतर वयाच्या २६ व्या वर्षी त्याने ‘यूपीएससी’ अखेर ‘क्रॅक’ केली. गौरव कार्यदे पाटीलची दुसरी झेप गेल्या वर्षी ‘यूपीएससी’त १४६ वा आणि राज्यात पाचवा क्रमांक मिळवणारा गौरव कार्यदे पाटील याने यंदाही २५० वा क्रमांक मिळवत यशाचा झेंडा फडकावला. गौरवचे वडील डॉ. गंगाधर कायंदे पाटील बीवायके महाविद्यालयात प्राध्यापक आहेत.
आधी लगीन कोंढाण्याचं! यूपीएससीत ६ वेळा अपयश, लग्नाआधी नम्रताचं UPSC Crack करण्याचं स्वप्न, अखेर यश खेचून आणलंच
नाशिकच्या सिल्व्हर ओक हायस्कूलमधून दहावी, आरवायके सायन्स कॉलेजमधून बारावी आणि पुण्याच्या सिंहगड कॉलेजमधून बी. ई. (कॉम्प्यूटर इंजिनीअरिंग) प्रथम श्रेणीत उत्तीर्ण करीत गौरवने शिक्षणाचा पाया भक्कम केला. अमेरिकन कंपनी ‘टिबको’ मध्ये नोकरी करीत असताना त्याने इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातून एम. ए. (लोकप्रशासन) प्रथम क्रमांकाने पूर्ण केले. ‘यूपीएससी’च्या तयारीसाठी तो दिल्लीत दाखल झाला होता. रात्रीचा दिवस करीत त्याने सलग दुसऱ्या वर्षी यश मिळविले आहे.
खाकीला कलंक! शंभर रुपयांसाठी हॉटेल कर्मचाऱ्यांना मारहाण, मुंबईत दोन पोलीस निलंबित
राजू वाघने जिद्दीने मिळविलेले यश
पेठ तालुक्यातील आंबेगण गावचा राजू वाघ हा ‘सीआरपीएफ’ मध्ये असिस्टंट कमांडंट म्हणून कार्यरत आहे. ‘यूपीएससी’ २०२४ मध्ये ८७१ वा क्रमांक मिळवत त्याने आपल्या संघर्षांवर यशाचा कळस चढवला आहे. शिक्षक वडील आणि गृहिणी आईच्या पाठबळाने राजूने स्पर्धा परीक्षांचा प्रवास सुरू केला. ‘कोल इंडिया मध्ये असिस्टंट मॅनेजर आणि नंतर ‘सीआरपीएफ’ मध्ये असिस्टंट कमांडंट म्हणून काम करताना त्याने ‘यूपीएससी’चा ध्यास कायम ठेवला. अनेक प्रयत्नांनंतरही यश हुलकावणी देत होते. निराशेने त्याने परीक्षा सोडण्याचा निर्णय घेतला. पण, पत्नी पौर्णिमा वाघ यांनी त्याला प्रोत्साहन दिले. त्यांच्या पाठिंब्याने राजूने पुन्हा जोमाने तयारी केली आणि यंदा ८७१ वा क्रमांक मिळवला.

