Jain Community Non Violent Rally : मुंबई महानगरपालिकेने हे मंदिर पाडल्यानंतर, आज सर्व पक्षांचे नेत्यांनी या कारवाईविरुद्ध मोर्चा काढला. या प्रकरणी पुढे काय करायचे याचा निर्णयही घेतला जाणार आहे. बीएमसीच्या कारवाईनंतर जैन समाजात प्रचंड संताप आहे. या प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात जैन समाजाकडून करण्यात येत आहे.
मुंबई महानगरपालिकेने हे मंदिर पाडल्यानंतर, आज सर्व पक्षांचे नेत्यांनी या कारवाईविरुद्ध मोर्चा काढला. या प्रकरणी पुढे काय करायचे याचा निर्णयही घेतला जाणार आहे. बीएमसीच्या कारवाईनंतर जैन समाजात प्रचंड संताप आहे. या प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात जैन समाजाकडून करण्यात येत आहे.
जैन समुदायाला नोटीस बजावली होती
केंद्रात भाजपा आणि महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार आहे. मुंबई महानगरपालिकेचा कार्यकाळ संपला आहे, त्यानंतर सध्या त्याची जबाबदारी सरकारकडे आहे. मंदिर पाडण्याबाबत बीएमसीने व्यवस्थापन समितीला Notice बजावली होती. या विरोधात जैन समाजाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणाची सुनावणी गुरुवारी होणार होती, परंतु त्याआधी बुधवारी BMCच्या पथकाकडून मंदिर पाडण्यात आले.
मंदिराच्या विश्वस्तांचं म्हणणं काय?
जैन समाजाच्या वतीने असे म्हटले आहे की, न्यायालयाच्या निर्णयानंतर BMC प्रशासनाने कारवाई करायला हवी होती. मंदिराचे विश्वस्त अनिल शाह म्हणाले की, मुंबई महानगरपालिकेने न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहिली नाही. मंदिराच्या विश्वस्तांनी सांगितले की, आम्ही उच्च न्यायालयात अपील दाखल केली आहे हे BMC ला माहित होते, परंतु BMC प्रशासनाने घाईघाईने मंदिर पाडले. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी जैन समाजाच्या वतीने करण्यात येत आहे.
निषेधापूर्वी जैन बांधवांनी आरती केली
मंदिराच्या विश्वस्तांनी सांगितले की, आम्ही अधिकाऱ्यांना न्यायालयाच्या निर्णयापर्यंत वाट पाहण्याची विनंती केली होती, परंतु त्यांनी आमचे ऐकले नाही. अनिल शाह म्हणाले की, जैन बांधव आज मंदिर पाडण्याच्या विरोधात अहिंसक निषेध करतील. या निषेधापूर्वी, जैन बांधवांनी ज्या मंदिरात ही कारवाई करण्यात आली होती तिथे आरती केली. याशिवाय, हे मंदिर कोणाच्या आदेशाने पाडण्यात आले असा प्रश्न जैन बांधवांनी विचारला आहे.

