• Fri. Mar 6th, 2026
    कर्जमाफीसाठी पैसे नाही, पण शक्तीपीठ मार्गासाठी घाई, कारण… बच्चू कडूंचा सरकारवर निशाणा

    Bacchu Kadu : सरकारकडे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पैसे नाहीत, पण शक्तीपीठ मार्गासाठी सरकारला घाई आहे. सरकारसाठी रस्ता महत्त्वाचा नाही, तर त्यातून पैसा वेगळ्या मार्गाने किती येईल हे महत्त्वाचं असल्याची टीका बच्चू कडू यांनी केली.

    Lipi

    अर्जुन राठोड, नांदेड : राज्यात शक्तीपीठ महामार्गाचा शेतकऱ्यांकडून विरोध कायम आहे. दुसरीकडे सरकार मात्र, शक्तीपीठ महामार्गासाठी आग्रही दिसत आहे. यावरुन प्रहार संघटनेचे अध्यक्ष, माजी आमदार बच्चू कडू यांनी सरकारवर गंभीर आरोप करत कडाडून टीका केली आहे. शेतकऱ्यांचं ३० हजार कोटी रुपयाचं कर्जमाफ करायला सरकारकडे पैसे नाहीत. पण, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारला घाई दिसत आहे. त्यांच्यासाठी रस्ता महत्वाचा नाही. पण, राज्यकर्त्यांना शक्तीपिठाचा पैसा वेगळ्या मार्गाने किती येईल हे महत्वाचं असल्याची टीका बच्चू कडू यांनी केली.

    एका कार्यक्रमासाठी माजी आमदार बच्चू कडू आज नांदेडला आले होते. यावेळी त्यांनी ही टीका केली. शक्तीपिठाची मागणी नागरिकांची नाही. शक्तीपीठ मार्ग निर्माण करताना कोणाचं पीठ कोण दळून खाणार आहे हे महत्वाचं आहे. त्यांचं पीठाकडे लक्ष आहे, शक्तीकडे नाहीये. पीठा मधील येणारा काही हिस्सा राज्यकर्त्यांच्या वाट्याला येईल हे खरं आहे, असं म्हणत बच्चू कडू यांनी सरकारवर निशाणा साधला.
    Pune Crime : खाजगी सावकाराचा जाच, पैशांसाठी सतत… तरुणाचं टोकाचं पाऊल; पुण्यातील घटनेने खळबळ

    बीडमध्ये माजी ब्रिगेडीयर नेण्याची गरज –

    संतोष देशमुख हत्या प्रकरण राज्यभर गाजत आहे. त्यातच बीड जिल्ह्यात मारहाणीचे अनेक प्रकार समोर येत आहेत. लाऊडस्पीकरच्या आवाजावरून एका महिला वकिलाला मारहाण करण्यात आल्याची घटना बीडमध्ये घडली आहे. बीड जिल्यात अशी अनेक प्रकरणं घडत आहेत. हे पाहता बीडमध्ये एखादा माजी सैनिक ब्रिगेडियर नेमला पाहिजे अशी प्रतिक्रिया माजी आमदार बच्चू कडू यांनी दिली.
    Uddhav Thackeray : ‘कुठे जाताय?…’; चंद्रकांत खैरेंच्या नाराजीच्या चर्चांवर उद्धव ठाकरेंचं विधान
    राज्य शासनातील अधिकारी बीडमधील प्रकरण मला वाटतं थांबवू शकेल. त्यामूळे सैन्य दलातील एखादा अधिकारी दिला, तर बीड तालावर येईल, असं देखील बच्चू कडू म्हणाले. यवतमाळमध्ये एका मुलीचा नदीत बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेवरुन बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली. देशात जाती धर्माच्या नावावर राजकारण होत असताना मोठी विषमता निर्माण झाली. एकीकडे अधिकारी आणि आमदारासाठी स्विमिंग टँक उपलब्ध आहेत. दुसरीकडे कपडे धुवायला सुध्दा घरात पाणी उपलब्ध होत नाही, असं दुर्दैव महाराष्ट्राच्या नशीबी असल्याचं ते म्हणाले.

    बीडमधून नवीनच काहीतरी ऐकायला येतं –

    निलंबित पोलीस उपनिरीक्षक रंजित कासले यांनी अनेक गंभीर आरोप केले आहे. या आरोपाचा तपास केला पाहिजे गंभीर प्रकरण आहे. मराठवाड्यात नवीन इतिहास होऊ नये हीच अपेक्षा आहे. बीडमधून नवीनच काहीतरी ऐकायला येतं. गृहखात फडणवीस साहेबांकडे आहे, दूध का दूध पाणी व्हायला किती वेळ लागतो, नाहीतर आमच्याकडे दोन दिवस द्या सगळं बाहेर काढू, असं बच्चू कडू म्हणाले.

    Nanded News : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पैसे नाही, पण शक्तीपीठ मार्गासाठी सरकारला घाई, कारण… बच्चू कडूंचा सरकारवर निशाणा

    शाळेत जर्मनी भाषा शिकली म्हणून वाह वाह, हिंदी भाषेचा विरोध का?

    आमदार-खासदार अधिकाऱ्यांची पोरं दहा-दहा भाषा शिकतात. गरीबाच्या पोराला शिकवण्यासाठी काय अडचण आहे. तो त्यांच्या विषय आहे पालकांचा त्यांनी शिकवायचं की नाही? भाषा शिकल्याने मराठी अस्मिता जाते असं काही नाही, नेहमी मराठी भाषा वापरली पाहिजे याच्याबद्दल दुमत नाही. पाट्या मराठीत लावल्या पाहिजे त्याच्याही बद्दल दुमत नाही, पण काय शिकावं हे राज ठाकरे कसं काय ठरवणार? शाळेत जर्मनी भाषा शिकली म्हणून त्याची वाह वाह होते, पण हिंदी शिकवते म्हणून त्याच्यावर तुम्ही प्रश्न निर्माण करत असाल तर हे चुकीचं असल्याचं बच्चू कडू म्हणाले.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed