कोकणात परप्रांतीयांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. रायगडमध्ये मनसेने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर, दापोलीत शिवसेनेने काजू बिया खरेदीच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या परप्रांतीयांच्या टोळीला पकडले. वजनात फेरफार करून लोकांची फसवणूक करत असल्याचा आरोप करत, पोलिसांनी 13 जणांना ताब्यात घेतले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या रायगड दौऱ्याच्या आधी रायगड जिल्ह्यात महाड तालुक्यात एका कंपनीत कामावर असलेल्या परप्रांतीय युवकाला माओवाद्यांशी संबंधित असल्याने अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता मनसेने याच मुद्द्यावर परप्रांतीयांच्या विषयाला हात घातला आहे. महाड तालुक्यात एमआयडीसीत व तालुक्यात राहणाऱ्या परप्रांतीची नोंद प्रशासनाने ठेवावी यासाठी महाड तालुका प्रशासनाला निवेदन देण्यात आल होत. मनसेच्या या निवेदनाची दाखल घेत गुरुवारी महाड तालुका प्रशासनाने बैठकीचे आयोजन केलं होतं.
बैठकीला पोलीस प्रशासनाचे अधिकारी नगर परिषद प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीतही वैभव खेडेकर यांनी आम्ही दिलेल्या निवेदनाचा परिणाम जर का महिनाभरात दिसला नाही तर मनसे स्टाईलने आंदोलन उभारू असा इशारा दिला आहे. त्यानंतर आता महाड एमआयडीसीत परप्रांतीय ठेकेदार परप्रांतीय कर्मचारी यांची नाव माहिती ठेवण्यासाठी महाड तालुक्याचे तहसीलदार महेश शितोळे यांनी लेखी पत्रच दिल आहे इतकच नाही तर महानगर परिषद प्रशासनालाही महाड शहर परिसरातील असलेल्या सोसायटी यामधून जाणारे परप्रांतीय यांचीही नोंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत अशी माहिती महाडचे तहसीलदार महेश शितोळे यांनी दिली.
रायगड जिल्ह्यात महाड एमआयडीसीतील एका कंपनीत काम करणाऱ्या युवकाला अटक केल्यानंतर संबंधित कंपनीवर कोणती कारवाई करण्यात आली याचाही जाब बैठकीत वैभव खेडेकर यांनी गुरुवारी झालेल्या बैठकीत महाड तालुका प्रशासनाला विचारला आहे. दापोलीत तब्बल 15 ते 20 जणांना पकडले यातील 13 जणांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. या धंद्यासाठी वापरल्या गेलेल्या तीन गाड्या ही दापोली पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. 35 किलो काजू बी असताना त्या 26 किलो भरणे तसेच इलेक्ट्रॉनिक काटा ऑपरेट करणारा रिमोट थेट खिशात ठेवून बटन दाबत वजनात फेरफार करणे अशा स्वरूपाचे उद्योग हे परप्रांतीय टोळके करत असल्याचा आरोप दापोलीत शिंदेंच्या शिवसेनेचे शहर प्रमुख प्रसाद उर्फ पप्पू रेळेकर यांनी केला आहे.
