• Fri. Mar 13th, 2026
    आसाममध्येही ‘जामतारा पॅटर्न’! क्रेडिट कार्डद्वारे बँकेला कोट्यवधींचा गंडा, पाच जणांना अटक

    Credit Card Fraud: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने आसामच्या मोरगाव जिल्ह्यातील ‘जामतारा पॅटर्न’ उघडकीस आणला आहे. क्रेडिट कार्डच्या माध्यमातून बँकेला कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी अटक केली.

    महाराष्ट्र टाइम्स
    credit card fraud

    मुंबई : सायबर गुन्हेगारी ही बिहारच्या जामतारापुरती मर्यादित राहिली नसून, देशाच्या कानाकोपऱ्यात सायबरचोरांच्या टोळ्या तयार होत आहेत. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने आसामच्या मोरगाव जिल्ह्यातील ‘जामतारा पॅटर्न’ उघडकीस आणला आहे. क्रेडिट कार्डच्या माध्यमातून बँकेला कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी अटक केली. या टोळीने बनावट आधारकार्ड आणि पॅनकार्डवर ५५ क्रेडिट कार्ड घेतल्याचे समोर आले आहे.

    फेब्रुवारी ते जून २०२४ या कालावधीत सुमारे ५५ जणांनी एक कोटी २६ लाख थकविल्याचे ‘एचएसबीसी’ बँकेच्या तपासणीत समोर आले. या थकबाकीदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्नात असताना त्यांनी बनावट ओळखपत्रांवर क्रेडिट कार्ड घेऊन बँकेची फसवणूक केल्याचे उघडकीस आले. या प्रकार समोर येताच बँकेचे नयन भगदेव यांनी याबाबत आझाद मैदान पोलिस ठाण्यात तक्रार केली. याप्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखा युनिट ३ चे प्रभारी पोलिस निरीक्षक सदानंद येरेकर यांच्या पथकाने समांतर तपास सुरू केला.
    Ants Smuggling: मुंग्यांची चक्क टेस्ट ट्यूबमधून तस्करी; परदेशी नागरिकांना ५००० मुंग्यांसह अटक
    बँक खात्यांचा तपशील, क्रेडिट कार्ड वापरल्याची ठिकाणे, गुन्हा करताना वापरलेले मोबाइल क्रमांक याचा बारकाईने अभ्यास करीत ही टोळी आसाममध्ये सक्रिय असल्याचे समजले. निरीक्षक शामराव पाटील, प्रशांत गावडे यांच्यासह आकाश मांगले, राहुल अनभुले, सुहास कांबळे, युवराज देशमुख यांच्या पथकाने आसाममधील गावे पिंजून काढत पाच जणांच्या मुसक्या आवळल्या.
    Manikrao Kokate: शेतकरी कर्जमाफीबाबत वरिष्ठांशी चर्चा; कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची माहिती
    गावागावांत सायबरचे धडे
    मोरगाव जिह्यातील अमरागुरी, लालीपत्थर, हत्यारबोरी, तातीपोरा, कारीमरी या गावात दिवसरात्र ठाण मांडून आणि रात्रीच्या वेळी शोध मोहीम घेत पोलिसांनी पाच जणांची धरपकड केली. या जिल्ह्यातील गावागावातील तरुणांना सायबर गुन्ह्यांचे धडे देण्यात आले आहेत. दोनशे- पाचशे मीटरवर कुणी अनोळखी दिसल्यास या गुन्हेगारांपर्यंत माहिती पोहोचते आणि ते गायब होतात. दिवसात हे चोर हाती लागतच नाही, रात्रीच्या वेळी तर चोरांचे वास्तव्य शोधणे त्याहून कठीण असल्याचे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने सांगितले.
    ‘त्या’ शिधापत्रिकांवर टाच! नाशिक जिल्ह्यातील २१ हजार ६६१ शिधापत्रिका तात्पुरत्या बंद, काय कारण?
    वित्तसंस्था, बँका मुख्य लक्ष्य
    या टोळीचे प्रमुख लक्ष्य वित्तसंस्था, बँका असल्याचे पुढे आले आहे. ही टोळी सिबिल स्कोर चांगला असलेल्या व्यक्तींचा डेटा मिळवते. त्या व्यक्तींच्या नावे आणि त्याच्या ओळखपत्राप्रमाणे बनावट आधारकार्ड आणि पॅनकार्ड तयार करते. यावेळी आपली ओळख समोर येणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली जाते. बनावट कागदपत्रांद्वारे घेतलेल्या क्रेडिट कार्डवर ऑनलाइन खरेदी किंवा काही रक्कम खात्यामध्ये वळती करतात. या टोळीने अशाप्रकारे आदित्य बिर्ला फायनान्स, एलटी फायनान्स, ऍक्सिस बैंक तसेच इतरही अनेक संस्थांची फसवणूक केली आहे

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed