• Thu. Mar 12th, 2026

    मुंबईतील आमदार निवासात भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू, रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्याचा अंदाज

    मुंबईतील आमदार निवासात भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू, रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्याचा अंदाज

    तनिषा भिसे यांचा मृत्यू करण ऐरणीवर असतानाच अजून एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे. आमदार निवासातून वारंवार फोन जाऊनही रुग्णवाहिका उपलब्ध झाला नसल्याने एका व्यक्तीनं जीव गमावला आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई: दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला हे प्रकरण ऐरणीवर असतानाच अजून एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे. आमदार निवासातून वारंवार फोन जाऊनही रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. त्यामुळे चंद्रकांत धोत्रे यांचे निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यांना हृदयविकाराच्या तीव्र वेदना होत होत्या. मात्र वेळीच उपचार उपलब्ध न झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

    मंत्रालयाच्या जवळ आकाशवाणी येथील आमदार निवासातील रुम नं ४०८ ही आमदार विजय देशमुख यांची खोली होती. तेथे मुंबईत कामानिमित्त आलेले चंद्रकांत धोत्रे वास्तव्यास होते. रात्री १२.३० च्या सुमारास त्यांना हृदयविकाराच्या वेदना जाणवू लागल्या. त्यावेळी रुग्णवाहिकेसाठी वारंवार फोन करण्यात आला मात्र कोणतीही रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. अखेर पोलिसांना फोन करण्यात आला. त्यानंतर त्यांना पोलिसांच्या वाहनातून जीटी रुग्णालयात नेण्यात आले मात्र तेथे नेल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. आमदार निवासातील फोन गेल्यानंतर रुग्णवाहिका उपलब्ध होत नसेल तर सर्वसामान्यांच काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

    चंद्रकांत धोत्रे यांच्या कुटुंबियांनी यासंबंधी कोणतीही तक्रार दाखल केली नाही. त्यामुळे पोलिसांनी या घटनेसंबंधी कोणतीही कारवाई केली नाही. धोत्रे यांचे नातेवाईक त्यांचा मृतदेह गावी घेऊन जाण्यासाठी रवाना झाले आहेत.

    विजयराव देशमुख यांचे कार्यकर्ते

    चंद्रकांत धोत्रे यांचा मुलगा विशाल धोत्रे हा आमदार विजयराव देशमुख यांचा कार्यकर्ता आहे. चंद्रकांत धोत्रे हे बैठकीनिमित्त मुंबईत आले होते. मात्र रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.

    आयसीयू विभाग नाही, डॉक्टरांचा हलगर्जीपणा , महिलेचा मृत्यू

    कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुग्णालयात एका महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्यावेळी डॉक्टरांच्या हलगर्जीपणाने मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांकडून करण्यात आला आहे. तसेच त्या रुग्णालयात आयसीयू नसल्याने दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात येत होते मात्र त्या दरम्यानच तिचा मृत्यू झाला.

    नारायण परब

    लेखकाबद्दलनारायण परब महाराष्ट्र टाइम्स मध्ये कंटेन्ट रायटर म्हणून कार्यरत आहे. २०१७ पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले आहे. नवराष्ट्रसाठी कंटेन्ट रायटर म्हणून काम केले असून विविध इंस्टाग्राम पेजसाठी ही कंटेन्टची निर्मिती केली आहे. जनसंपर्क क्षेत्रातही फ्रिलान्सर म्हणून काम करण्याचा अनुभव. ऑल इंडिया रेडिओसाठीही काम केले आहे . क्रीडा, राजकारण, देश-विदेश, मनोरंजन, करिअर, ऑटो या कार्यक्षेत्रांमध्ये विशेष रस.
    साठये महाविद्यालयातील माध्यम विभागात २०१७ पासून व्याख्याता म्हणून कार्यरत.
    … आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed