• Sat. Mar 7th, 2026

    ‘त्या’ 14 गावांसाठी ठाकरे गटाची वेगळीच मागणी, मंत्री गणेश नाईकांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

    ‘त्या’ 14 गावांसाठी ठाकरे गटाची वेगळीच मागणी, मंत्री गणेश नाईकांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

    | Updated: 3 Apr 2025, 11:00 pm

    कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील 14 गावे, केडीएमसीमधील 18 गावे आणि 5 गावे अंबरनाथ तालुक्यातील ही गावे घेऊन नविन नगरपरिषद होणार का? असा प्रश्न आता उपस्थित होतोय.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    डोंबिवली : कल्याण ग्रामीण मतदारसंघातील 14 गावे नवी मुंबई महापालिका हद्दीत समाविष्ट करण्याच्या निर्णयाला वनमंत्री गणेश नाईक यांनी विरोध केला आहे. त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत पत्र पाठविले आहे.नवी मुंबईसाठी 14 गावे भौगोलिकदृष्टया नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये समाविष्ट करणे व्यावहारिक होणार नाही, असे नाईक यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. त्यामुळे आता या 14 गावांचा फुटबॉल झाला की काय? अशी चर्चा रंगू लागली आहे.

    कल्याण ग्रामीणमधील 14 गावांचा विषय अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे 14 गावे नक्की नवीमुंबई महापालिकेत समाविष्ट होणार की नाही? असा प्रश्न येथील गावातील नागरिकांना पडलाय. त्यातच आता कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील 14 गावे, केडीएमसीमधील 18 गावे आणि 5 गावे अंबरनाथ तालुक्यातील ही गावे घेऊन नविन नगरपरिषद करावी, अशी मागणी ठाकरे गटाने मंत्री गणेश नाईक यांच्याकडे केली आहे. त्यामुळे 14 गावांचा विषय पुन्हा एकदा चर्चेला आला आहे.

    याबाबत ठाकरे गटाचे जिल्हा अध्यक्ष दीपेश म्हात्रे यांनी वेगळी मागणी केली आहे. “अधिवेशन संपल तरी 14 गावांचा कोणता निर्णय झालेला नाही. तर ही 14 गावे, केडीएमसीमधील 18 गावे आणि 5 गावे अंबरनाथ तालुक्यातील ही नावे घेऊन नवीन परिषद करावी, अशी मागणी केली आहे आणि नगरपरिषदेच्या माध्यमातून या भागाचा विकास चांगला करता येईल आणि येथील नागरिकांना न्यान मिळेल, तसेच येथील विकासासाठी नाईक साहेब योग्य निर्णय घेतली. नाईक साहेब 100 टक्के सकारात्मक आहेत आणि सकारात्मक निर्णय लवकरच येईल अशी अपेक्षा आहे”, असं दीपेश म्हात्रे यांनी सांगितलं.
    Pune : भाजप आमदाराच्या पीएच्या पत्नीचा मृत्यू, आरोपांनंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची अधिकृत प्रतिक्रिया
    याबाबत माजी खासदार संजीव नाईक यांनी देखील प्रतिक्रिया दिली. “गणेश नाईक यांनी याबाबत आपले मत व्यक्त केलेलं आहे. मला विश्वास आहे की या संदर्भात लवकरचं निर्णय होईल”, असं संजीव नाईक म्हणाले. तर याच 14 गावच्या विषयाबाबत 14 गाव विकास समितीने मनसे नेते आणि माजी आमदार राजू पाटील यांची भेट घेतली आहे आणि पत्रही दिले आहे. या विषयाबाबत राजू पाटील म्हणाले, की सदर गावे नवी मुंबई महापालिकेत घेण्याचा निर्णय झालेला आहे.

    राजू पाटील काय म्हणाले?

    “गावांसाठी नगर विकास खात्याकडून किंवा सरकारकडून कोणताही निधी वर्ग झालेला नाही. त्यामुळे त्यांचे साहजिकच अशी भावना झाली आहे की, नवी मुंबईवर तो भुर्दंड पडेल. पण आमची त्यांना एक विनंती आहे, इथला टॅक्स वसूल केला तर शंभर दीडशे कोटींची वसुली होईल. तिकडे अनधिकृत बांधकामांबद्दल त्यांची जी ओरड आहे, ही बांधकामे सगळीकडे आहेत आणि हा सर्व विषय प्रशासनाचा अंमलबजावणीचा विषय आहे, त्यामुळे सरकारने तो करावा. त्यालाही कोणाची अडकाठी नाही. उगीचच 14 गावे नवी मुंबईत सामील झाली असताना त्याचा दप्तर घेण्यात दिरंगाई करून या गावकऱ्यांना वेठीस धरू नये ही आमची विनंती आहे”, असे मनसे नेते राजू पाटील यांनी सांगितले. त्यामुळे ही 14 गावे नवीमुंबई महापालिकेत समाविष्ट होणार? की ठाकरे गटाने नगरपरिषद मागणी पूर्ण केली जाणार हे आता पहावे लागेल.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed