• Sat. Apr 5th, 2025 9:01:25 PM
    भूमिका घेता येत नाही अन् लांगूलचालनही..; उद्धव ठाकरेंच्या टीकेवर बावनकुळेंचा पलटवार

    Chandrakant Bawankule on Uddhav Thackeray- वक्फ विधेयकावरून उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार टीका केली असताना मंत्री बावनकुळे यांनी जोरदार पलटवार केला आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई: उद्धव ठाकरे यांनी वक्फ विधेयकावर आज पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार टीका केली. राजकीय पोळ्या भाजायचं विकृत राजकारण भाजप करत आहे. भाजपचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे असल्याचे म्हणाले. तसेच अमेरिका, चीन या मुद्द्यावरही सत्ताधाऱ्यांवर तोफ डागली होती. त्यावर मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी जोरदार पलटवार केला आहे. भूमिका घेता येत नाही आणि लांगूलचालनही सोडता येत नाही अशी अवस्था तुमची झाली आहे. तसेच या पोस्टमध्ये त्यांनी संजय राऊत यांचा उद्देश साध्य झाला असल्याचेही म्हटले आहे. ‘संजयराऊतप्रोटिझम’ असा उल्लेख यात केला आहे.

    काय म्हणाले बावनकुळे?
    बावनकुळे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट मध्ये लिहिले की, अरे कहना क्या चाहते हो? उद्धव ठाकरे यांनी पत्रपरिषद घेऊन भूमिका मांडली याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. निदान ते किती संभ्रमात, एकाकी आणि खचलेल्या मनस्थितीत आहेत, याचे प्रदर्शन आम्हाला पाहायला मिळाले.

    ‘संजयराऊताप्नोटिझम’
    संजय राऊत यांचा उद्देश साध्य झालेला आहे. तुमचे ‘संजयराऊताप्नोटिझम’ आता पूर्ण झाले आहे. एकीकडे त्यांना साधी भूमिका घेता येत नाही आणि दुसरीकडे लांगूलचालनही सोडता येत नाही. करे तो करे क्या, अशी त्यांची अवस्था झालीय.अरे कहना क्या चाहते हो? असा उच्चार तुम्ही केलात, पण नेमका हाच प्रश्न महाराष्ट्राला, ही पत्रपरिषद ऐकल्यावर तुमच्या बाबतीत पडला आहे.

    विधेयक लोकसभेत पारित, राज्यसभेत चर्चा सुरूलोकसभेत वक्फ सुधारणा विधेयक बुधवारी मांडले गेले. हे विधेयक लोकसभेत बहुमतांच्या आधारे पारित केले गेले. बिलाच्या समर्थनार्थ २८८ मत पडली तर विरोधात २३२ मते पडली. इंडिया आघाडीने या विधेयकाला विरोध केला होता. आज विधेयक राज्यसभेत मांडले गेले आहे. सध्या राज्यसभेत विधयेकावर चर्चा होत आहे. राज्यसभेत विधेयक पारित होण्यासाठी ११९ मतांची आवश्यक सरकारला आहे. सरकार सहयोगी पक्षांच्या आधारे बहुमत गाठू शकते. महाराष्ट्रातील सहकारी राष्ट्रवादी अजित पवार गटाची मतेही त्यासाठी निर्णायक ठरणार आहेत.

    नारायण परब

    लेखकाबद्दलनारायण परब महाराष्ट्र टाइम्स मध्ये कंटेन्ट रायटर म्हणून कार्यरत आहे. २०१७ पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले आहे. नवराष्ट्रसाठी कंटेन्ट रायटर म्हणून काम केले असून विविध इंस्टाग्राम पेजसाठी ही कंटेन्टची निर्मिती केली आहे. जनसंपर्क क्षेत्रातही फ्रिलान्सर म्हणून काम करण्याचा अनुभव. ऑल इंडिया रेडिओसाठीही काम केले आहे . क्रीडा, राजकारण, देश-विदेश, मनोरंजन, करिअर, ऑटो या कार्यक्षेत्रांमध्ये विशेष रस.
    साठये महाविद्यालयातील माध्यम विभागात २०१७ पासून व्याख्याता म्हणून कार्यरत.
    … आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed