Chandrakant Bawankule on Uddhav Thackeray- वक्फ विधेयकावरून उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार टीका केली असताना मंत्री बावनकुळे यांनी जोरदार पलटवार केला आहे.
काय म्हणाले बावनकुळे?
बावनकुळे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट मध्ये लिहिले की, अरे कहना क्या चाहते हो? उद्धव ठाकरे यांनी पत्रपरिषद घेऊन भूमिका मांडली याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. निदान ते किती संभ्रमात, एकाकी आणि खचलेल्या मनस्थितीत आहेत, याचे प्रदर्शन आम्हाला पाहायला मिळाले.
‘संजयराऊताप्नोटिझम’
संजय राऊत यांचा उद्देश साध्य झालेला आहे. तुमचे ‘संजयराऊताप्नोटिझम’ आता पूर्ण झाले आहे. एकीकडे त्यांना साधी भूमिका घेता येत नाही आणि दुसरीकडे लांगूलचालनही सोडता येत नाही. करे तो करे क्या, अशी त्यांची अवस्था झालीय.अरे कहना क्या चाहते हो? असा उच्चार तुम्ही केलात, पण नेमका हाच प्रश्न महाराष्ट्राला, ही पत्रपरिषद ऐकल्यावर तुमच्या बाबतीत पडला आहे.
विधेयक लोकसभेत पारित, राज्यसभेत चर्चा सुरूलोकसभेत वक्फ सुधारणा विधेयक बुधवारी मांडले गेले. हे विधेयक लोकसभेत बहुमतांच्या आधारे पारित केले गेले. बिलाच्या समर्थनार्थ २८८ मत पडली तर विरोधात २३२ मते पडली. इंडिया आघाडीने या विधेयकाला विरोध केला होता. आज विधेयक राज्यसभेत मांडले गेले आहे. सध्या राज्यसभेत विधयेकावर चर्चा होत आहे. राज्यसभेत विधेयक पारित होण्यासाठी ११९ मतांची आवश्यक सरकारला आहे. सरकार सहयोगी पक्षांच्या आधारे बहुमत गाठू शकते. महाराष्ट्रातील सहकारी राष्ट्रवादी अजित पवार गटाची मतेही त्यासाठी निर्णायक ठरणार आहेत.