• Sat. Mar 7th, 2026

    Nashik News: उन्हाळ कांद्यावर ‘अवकाळी’चे सावट; कसमादेत पावणेतीन लाख हेक्टरवर लागवड, शेतकरी चिंतेत

    Nashik News: उन्हाळ कांद्यावर ‘अवकाळी’चे सावट; कसमादेत पावणेतीन लाख हेक्टरवर लागवड, शेतकरी चिंतेत

    Nashik News: कसमादेत सुमारे अडीच ते पावणेतीन लाख हेक्टर क्षेत्रावर उन्हाळ कांदा पिकाची लागवड करण्यात आली आहे. मात्र, काढणीला आलेल्या उन्हाळा कांद्यावर अवकाळी पावसाचे सावट दिसत असल्याने शेतकरी चिंतेत आहे.

    महाराष्ट्र टाइम्स
    onion farm2

    म. टा. वृत्तसेवा, मालेगाव : यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने कसमादे परिसरात मुबलक पाणी उपलब्ध आहे. परिणामी यंदा कांद्याचे बम्पर पीक घेण्यात आले आहे. कसमादेत सुमारे अडीच ते पावणेतीन लाख हेक्टर क्षेत्रावर उन्हाळ कांदा पिकाची लागवड करण्यात आली आहे. मात्र, काढणीला आलेल्या उन्हाळा कांद्यावर अवकाळी पावसाचे सावट दिसत असल्याने शेतकरी चिंतेत आहे.

    एरव्ही डिसेंबरअखेर संपुष्टात येणारी उन्हाळ कांदा लागवड यावर्षी जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत सुरू होती. बदलते ऋतुमान, रोपांची उशिरा पेरणी त्यामुळे कांदा लागवड हंगाम लांबणीवर पडला. तरी कांद्याला अपेक्षित असलेली थंडी टिकून असल्याने उशिरा लागवड झालेल्या कांद्याच्या भरघोस उत्पादनाची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.
    Digital Begging: क्यूआर कोड स्कॅनर के नाम पे दे दे… मुंबईत भिकारीही मागतायत ‘डिजिटल’ भीक
    आगामी दोन महिन्यात बेमोसमी पावसावर कांदा पिकाचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. मागील वर्षी उशिरापर्यंत झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात कांदा रोपे खराब झाली होती. त्यामुळे चार वेळा बियाणे विकत घेऊन कांदा रोपे जगविण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती.
    ‘पीएमआरडीए’चा आराखडा रद्द; पुण्याबाबत मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, सर्व प्रक्रिया पुन्हा राबवणार
    लागवडीखालील क्षेत्र वाढले
    कसमादे परिसरात यंदा विक्रमी कांदा लागवड झाली आहे. यंदा तब्बल पावणेतीन लाख क्षेत्रावर उन्हाळ कांद्याची लागवड झाली आहे. मालेगाव तालुक्यात ४१ हजार २२५, बागलाणमध्ये ५२ हजार ७८६, तर नांदगाव तालुक्यात २२ हजार ०९५ हेक्टरवर कांदा लागवड करण्यात आली आहे. मुंगसे बाजार आवारात कांद्याची आवकही वाढली आहे. जानेवारी महिन्यात तीन लाख २६ हजार २४७ क्विंटल कांद्याची आवक होती. सरासरी १९५९ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. कसमादे परिसरात ठिंबक सिंचनमुळेही कांद्याचे क्षेत्र वाढले आहे.
    ईडीची मुंबईतील प्रसिद्ध बिल्डरवर मोठी कारवाई; तब्बल ४४ कोटींच्या मालमत्तेवर टाच, नेमकं प्रकरण काय?
    यंदा उन्हाळ कांद्याच्या लागवडीखालील क्षेत्रात वाढ झाली 66 आहे. त्यामुळे देशात कांदाटंचाई निर्माण होण्याची शक्यता नाही. बियाणे, रासायनिक खते, औषधे व मजुरीचे दर वाढल्याने उत्पादन खर्चही वाढला आहे. कांद्याला उत्पादन खर्चापेक्षा अधिकचा दर मिळण्यासाठी केंद्र शासनाने जास्तीत जास्त कांदा निर्यातीसाठी प्रयत्न करावेत. –चंद्रकांत शेवाळे, सभापती, मालेगाव बाजार समिती

    यंदा सुरुवातीच्या खराब हवामानामुळे शेतकऱ्यांचे तीन ते चार वेळा बियाणे वाया गेले. लागवडीच्या काळात वाढलेल्या खतांच्या किमती, महागाई, वाढलेली मजुरी अशा कारणांमुळे उत्पादन खर्च वाढला आहे. उत्पादन खर्चावर आधारित कांद्याला दर मिळावा. – विवेक देसले, कांदा उत्पादक

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed