• Sat. Mar 7th, 2026
    Sanjay Raut : ‘वक्फच्या बिलाचा आणि हिंदुत्त्वाचा काही संबंध नाही, RSSचा ही विरोध, हे फक्त…’; संजय राऊतांचा गंभीर आरोप

    Sanjay Raut on Waqf Amendment Bill : लोकसभेत वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक मांडले जाणार असल्याने संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. विधेयकासंदर्भात त्यांनी हिंदुत्त्वाचा उल्लेख करणे मूर्खपणा असल्याचे सांगितले. शिवसेना प्रोग्रेसिव्ह विचारांच्या हिंदुत्त्ववादाची पुरस्कर्ता असल्याचे त्यांनी म्हटले. वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाचा हिंदुत्त्वाशी संबंध नसल्याचे सांगितले.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : आज लोकसभेत वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक दुपारी मांडले जाणार आहे. संध्याकाळी आठ वाजेपर्यंत चर्चा चासणार आहे. विधेयकाध्ये विरोधी पक्ष काँग्रेसने (Congress) सुचवलेल्या सुधारणांमध्ये बदल कला न गेल्याने त्यांनी नारजी व्यक्त केली आहे, अशातच यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी (Sanjay Raut) निशाणा साधला आहे.

    देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला शिवसेना, बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुत्त्व शिकवू नये. भाजपला मिशा फुटल्या नव्हत्या तेव्हा आम्ही हिंदुत्त्वाच्या मिशांना पिळ मारत देशभर फिरत होतो. वक्फच्या बिलाचा आणि हिंदूत्त्वाचा काही संबंध नाहीये. हे एक साधारण बिल असून त्यात काही सुधारणा सरकार करु इच्छित आहे. या सुधारणांना फक्त देशातील मुसलमानांचाच नाहीतर संघाचाही पूर्ण पाठिंबा नाही. जसं औरंगजेबाची कबरी तोडण्यासंदर्भात घेतलेल्या भूमिकेला संघाने विरोध केला की उगाच वातावरण खराब करू नका. आताही संघाची अशीच भूमिका आहे. या बिलाचा आणि हिंदुत्त्वाचा काही संबंध आहे का हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगू शकतील काय़? असा सवाल संजय राऊतांनी फडणवीसांना केला आहे .
    आज ‘वक्फ’कल्लोळ; वादग्रस्त विधेयक लोकसभेत मांडले जाणार, प्रचंड गोंधळाचे संकेत
    इतर सुधारणा बिलांप्रमाणे हे एक बिल आहे. या बिलाच्या समंध सरकारने आणला तर वक्फ बोर्डाच्या संपत्तीवर भविष्यामध्ये कप्जा मिळवण्यासाठी काही उद्योगपतींना सोप्प जावं यासाठी या बिलाचं स्पष्ट प्रयोजन दिसत आहे. शिवसेना ही प्रोग्रेसिव्ह विचारांचा हिंदुत्त्ववाद मानणारी आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी सातत्याने हिंदुत्त्वाला सुधारणा आणि विज्ञानवाद याचा पाठिंबा दिला आहे. फडणवीस असतील किंवा त्यांचे बगलबच्चे असतील वक्फ बोर्डाच्या निमित्ताने बांग देतायेत हा मूर्खपणा आहे. हिंदुत्त्व हे हिंदुत्त्वाच्या ठिकाणी असल्याचं राऊत म्हणाले.

    आम्ही विरोधी पक्षात असताना भाजपने आणलेल्या कलम ३७० च्या बिलाला पाठिंबा दिला होता. तो विषय राष्ट्रीय सुरक्षा, राष्ट्रीय एकात्मता आणि हिंदुत्त्वाच्या संदर्भात होता. त्यानंतर तिहेरी तलाकच्याही बिलालाही विरोध केला नाही कारण तो विषय गरीब महिलांच्या संदर्भात विषय होता. आता वक्फ बोर्डच्या बिलाचा विषय हा त्यांच्या लाखो आणि कोटी रूपयांच्या जमिनीसंदर्भातील विषय आहे. भविष्यामध्ये त्या प्रॉपर्टी लाडक्या उद्योगपतींना देता येईल का ही त्यासाठी झालेली पायाभरणी आहे. हे मला स्पष्ट दिसत अससल्याचा दावा राऊतांनी केला आहे.

    हरिश मालुसरे

    लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed