• Tue. Jun 16th, 2026
    Raj Thackeray: इतिहास व्हॉट्सॲपवरुन समजत नाही; मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंचे प्रतिपादन

    Raj Thackeray Speech: विदेशी विद्यापीठांत औरंगजेबावर जेव्हा अभ्यास होतो, तेव्हा त्यांना छत्रपती शिवाजी महाराज वाचावेच लागतात’, असे प्रतिपादन मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी केले

    महाराष्ट्र टाइम्स
    raj thackeray

    मुंबई : ‘इतिहास व्हॉट्सॲपवरून समजून घेता येत नाही. त्यासाठी पुस्तके वाचावी लागतात. विदेशी विद्यापीठांत औरंगजेबावर जेव्हा अभ्यास होतो, तेव्हा त्यांना छत्रपती शिवाजी महाराज वाचावेच लागतात’, असे प्रतिपादन मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी केले. पक्षाच्याच्या गुढीपाडवा मेळाव्यात ते बोलत होते.

    ‘शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेब वर्षभरातच महाराष्ट्रात आला. तो २७ वर्षे इथे लढत होता. नरहर कुरुंदकर एके ठिकाणी म्हणतात की, मराठे सर्व लढाया हरत होते. मात्र औरंगजेब एकही लढाई जिंकत नव्हता. याचा अर्थ समजून घ्यायला हवा. त्याच्यासोबत संभाजी महाराज त्यानंतर संताजी, धनाजी, ताराराणी असे थोर लोक लढत राहिले. अफगाणिस्तानपासून ते दक्षिणेपर्यंत आणि गुजरातपासून बंगालपर्यंत साम्राज्य असलेल्या या बादशहाला अडीच तीन जिल्ह्यांच्या राज्यात काय रस होता? त्याला शिवाजी महाराजांचा विचार सलत होता’, असे राज यांनी नमूद केले.
    Namo Shetkari: शेतकऱ्यांचा गुढीपाडवा जोरात; ‘नमो शेतकरी योजने’चा सहावा हप्ता ३१ मार्चपूर्वी बॅंक खात्यात होणार जमा
    सध्या इतिहासात प्रत्येक गोष्ट ही जात-धर्माच्या अनुषंगाने पाहिली जात असल्याचे राज म्हणाले. ‘मिर्झाराजे जयसिंग आणि उदय भान हे राजपूत होते, तर अफझलखानाचा वकील कुलकर्णी नावाचा ब्राह्मण होता. शिवाजी महाराजांचा वकीलही ब्राह्मणच होता. त्याकाळी प्रत्येकजण कुठे ना कुठे कोणाची चाकरी करत होता. त्यात जातीपाती शोधून आत्ता समाजात विष कालवणे हे काहीजण राजकीय उद्देशापोटी करत आहेत’, अशी टीका त्यांनी राजकीय नेत्यांवर केली. धर्माच्या आधारावर कुठलाही देश उभा राहत नसल्याचे मत राज यांनी यावेळी व्यक्त केले. याबाबतीत तुर्कस्तानचे उदाहरण देताना ते म्हणाले, ‘त्या देशात केमाल पाशाने शरियत काढून टाकली, धर्माला राजकारणातून हद्दपार केले. आज त्या देशात केवळ पर्यटनासाठी दरवर्षी पाच कोटी लोक जातात व ४०० बिलियन डॉलर्स त्यातून ते कमावतात.’
    Devidas Pingale: …तर राजकीय संन्यास घेईल! देवीदास पिंगळेचे सभापतींसह संचालकांना खुलं चॅलेंज
    राज यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच गंगेच्या पाण्यावरून केलेल्या विधानामुळे सोशल मीडियातून त्यांच्यावर झालेल्या टीकेचा समाचार घेतला. गंगा किती प्रदूषित आहे, हे त्यांनी चित्रफित दाखवून समोर आणले. ‘आपल्या देशातील असंख्य नद्या प्रदूषित असून त्यात महाराष्ट्रातील ५५ नद्यांचा समावेश आहे. गंगा नदीत प्रेत तशीच फेकून दिली जातात. हे सगळे धर्माच्या नावावर सुरू आहे. हजारो वर्षांपूर्वीच्या परंपरांनी आपले नैसर्गिक वैभव लयाला जाणे चूक आहे. मृत्यूपश्चात लाकाडांवर जाळणे योग्य नसून विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार व्हायला हवेत. लाकडांवर जाळल्यानेच देशात मोठ्या प्रमाणावर जंगलतोड होत’, असा दावा त्यांनी केला.
    शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन माझ्या ऐकण्यात नाही! कृषिमंत्री कोकाटेंनी हात झटकले, नेमकं काय म्हणाले?
    ‘अदानी हुशार, आम्ही अडाणी निघालो!’
    आपल्या भाषणात राज यांनी अदानींना लक्ष्य केले. ‘सध्याच्या राजकीय वादात मधल्यामध्ये अदानींना जमिनी मिळत आहेत. धारावीची जागा मिळाली, नवी मुंबई विमानतळ, पालघर आणि इतर जमिनी त्यांना देण्यात आल्या. त्यामुळे अदानी हुशार आणि आम्ही अडाणी निघालो’, असा टोला त्यांनी लगावला.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed