• Sat. Jun 6th, 2026
    वेताळ शेळके ठरला ‘महाराष्ट्र केसरी’चा मानकरी, पृथ्वीराज पाटीलला धूळ चारत पटकावली मानाची गदा

    Maharashtra Kesari Winner : यंदाच्या महाराष्ट्र केसरी अंतिम सामन्याचा विजेता ठरला आहे. सोलापूरच्या वेताळ शेळके याने महाराष्ट्र केसरी गदा आपल्या नावावर केली आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    अहिल्यानगर : यंदाच्या महाराष्ट्र केसरी अंतिम सामन्याचा विजेता ठरला आहे. सोलापूरच्या वेताळ शेळके याने महाराष्ट्र केसरी गदा आपल्या नावावर केली आहे. वेताळ शेळके यंदाच्या ६६ व्या महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरला. अटीतटीच्या अशा अंतिम सामन्यात वेताळ शेळकेने पृथ्वीराज पाटीलला पराभवाची धूळ चारत गदा आपल्या नावावर केली. सोशल मीडियावरुन तसेच सर्वच स्तरातून वेताळवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

    अहिल्यानगरमध्ये रंगला महाराष्ट्र केसरीचा थरार

    अहिल्यानगरमधील दादा पाटील महाविद्यालयाजवळील मैदानात महाराष्ट्र केसरीचा थरार रंगला. राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर जिल्हा तालीम संघ आणि आमदार रोहित पवार मित्रमंडळातर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत महाअंतिम सामना पार पडला. हा सामना पाहण्यासाठी असंख्य कुस्तीप्रेमींनी एकच गर्दी केली होती. तर अनेक क्षेत्रातील दिग्गजांनीही उपस्थिती होती. मानाच्या महाराष्ट्र केसरी गदेसाठी पृथ्वीराज आणि वेताळ या दोघांमध्ये अटीतटीचा सामना रंगला. मात्र अखेरीस वेताळ पृथ्वीराजवर सरस ठरला. वेताळने पृथ्वीराजला पराभवाची धूळ चारली आणि मानाची गदा पटकावली. तर पृथ्वीराजला उपविजेता म्हणून समाधान मानावं लागलं आहे.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed