• Thu. Mar 12th, 2026
    ‘Devendra Fadnavis आमचा पाठिंबा निश्चित राहील, पण…’, Raj Thackeray यांचं सूचक वक्तव्य

    Raj Thackeray on Devendra Fadnavis : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपसोबत जाणार का? याबाबत राज ठाकरे यांनी स्पष्टपणे संकेत दिले आहेत. त्यांच्या या संकेतावरुन भाजपकडून काय प्रतिक्रिया देण्यात येते ते देखील पाहणं महत्त्वाचं आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत मनसे आणि भाजपची युती होईल का? या प्रश्नावर राज ठाकरे यांनी स्पष्टपणे भाष्य केलेलं नाही. त्यांनी आजच्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यात विविध मुद्द्यांवरुन महायुती सरकारवरही निशाणा साधला आहे. असं असलं तरी आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपसोबत जाणार का? याबाबत त्यांनी स्पष्टपणे संकेत दिले आहेत. “आता झालं निवडणुका संपल्या. शिमगा झाला आहे. होळी संपलेली आहे. तुमच्या साक्षीने सांगतो, देवेंद्र फडणवीस तुमच्या हातामध्ये एक चांगलं, सुसंस्कृत राज्य आलेलं आहे, याच्याकडे नीट बघा. मराठी माणसाला चांगल्या पद्धतीने पाहणार असेल तर आमचा पाठिंबा निश्चित राहील. प्रत्येक गोष्टीत पाठिंबा राहील. पण प्रत्येक गोष्ट आमची ऐकून करा”, अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली. “हा महाराष्ट्र आसुसलेला आहे. आता उन्हाळा आहे. आता पाण्याचे प्रश्न सुरु होतील. शेतकरी आत्महत्येचे प्रश्न आहेत. कंपन्या लिटून जात आहेत”, असंही राज ठाकरे म्हणाले.

    “तुम्ही सगळे जातीपातीचे भेद बाजूला सारुन एकत्र आलं पाहिजे. तामिळनाडू बघा. तामिळनाडूत हिंदी आणत आहेत. पण तिथल्या लोकांनी नाही सांगितलं. हिंदू येऊ देणार नाही. केरळमध्ये येऊ देणार नाही. आम्हीच लोटांगण घालतोय. आम्हालाच समजत नाही, आम्ही काय करायचं. मी इतका भांबावलेला मराठी माणूस आजपर्यंत बघितलेला नाही. मी इतका राजकारणाता झालेला चिखल देखील आजपर्यंत पाहिलेला नाही. कोणत्याच गोष्टींचं आम्हाला गांभीर्य उरलेलं नाही. सगळेजण त्या इन्स्टाग्रामवर चालू आहेत. कारण डान्सबार बंद झाले. तिकडे जे हे चालायचं ते मोबाईलवर आले. कशात गुंतून पडले आहात हे एकदा विचार करा”, असं राज ठाकरे म्हणाले.

    ‘अदाणी हुशार निघाला, आम्ही अडाणी निघालो’

    “माझं महाराष्ट्रातील सर्व तरुण-तरुणींना आवाहन आहे, व्हाट्सअपवर इतिहास वाचणं बंद केला. इतिहास ज्यावेळेला कुणी जातीतून सांगण्याचा प्रयत्न करेल, त्यावेळेस लक्षात ठेवा, तो कुठल्यातरी पक्षाला बांधील असेल. तुमची फक्त माथी भडकावण्यासाठी हे केलं जातं. तुम्ही एक येऊच नये, तुम्ही मराठी म्हणून एक होऊच नये म्हणून यासाठी हे प्रयत्न चालू असतात. मुळात विषय वेगळे असतात, मग असले विषय काढून तुम्हाला भरकवटलं जातं. तुम्हाला वेगळ्या विषयाकडे नेलं जातं. आम्ही तिकडे बघतो आणि बाकीचे इकडे काम आटपून घेतात. मधल्यामध्ये उद्योगपती गौतम अदाणींना जमीनपण दिली जाते. मुंबईचा विमानतळ अदाणींना दिला. नवी मुंबईचं विमानतळ अदाणींना, पालघरचं विमानतळ अदाणींना, तिथलं बंदर अदाणींना, अदाणी हुशार निघाला, आम्ही अडाणी निघालो”, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.
    Raj Thackeray : औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातून हटवावी का? राज ठाकरे यांची रोखठोक भूमिका
    “कित्येक गोष्टी आहेत ज्या विधानसभेत बोलल्या जाऊ नयेत. लाडकी बहीणचं काय झालं? काही नाही. ती योजना बंद होणार. मी निवडणुकीला सांगत होतो. पण माझं खरं सांगून पटलं नाही, त्यांनी खोटं सांगितलेलं पटलं. महत्त्वाच्या विषयांकडे दुर्लक्ष करायचं आणि नको तिकडे विषय भरकटवायचा. विधानसभेत चर्चा कशावर करायची? तर औरंगजेबावर”, अशीदेखील टीका राज ठाकरे यांनी केली.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed