Raj Thackeray on Devendra Fadnavis : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपसोबत जाणार का? याबाबत राज ठाकरे यांनी स्पष्टपणे संकेत दिले आहेत. त्यांच्या या संकेतावरुन भाजपकडून काय प्रतिक्रिया देण्यात येते ते देखील पाहणं महत्त्वाचं आहे.
“तुम्ही सगळे जातीपातीचे भेद बाजूला सारुन एकत्र आलं पाहिजे. तामिळनाडू बघा. तामिळनाडूत हिंदी आणत आहेत. पण तिथल्या लोकांनी नाही सांगितलं. हिंदू येऊ देणार नाही. केरळमध्ये येऊ देणार नाही. आम्हीच लोटांगण घालतोय. आम्हालाच समजत नाही, आम्ही काय करायचं. मी इतका भांबावलेला मराठी माणूस आजपर्यंत बघितलेला नाही. मी इतका राजकारणाता झालेला चिखल देखील आजपर्यंत पाहिलेला नाही. कोणत्याच गोष्टींचं आम्हाला गांभीर्य उरलेलं नाही. सगळेजण त्या इन्स्टाग्रामवर चालू आहेत. कारण डान्सबार बंद झाले. तिकडे जे हे चालायचं ते मोबाईलवर आले. कशात गुंतून पडले आहात हे एकदा विचार करा”, असं राज ठाकरे म्हणाले.
‘अदाणी हुशार निघाला, आम्ही अडाणी निघालो’
“माझं महाराष्ट्रातील सर्व तरुण-तरुणींना आवाहन आहे, व्हाट्सअपवर इतिहास वाचणं बंद केला. इतिहास ज्यावेळेला कुणी जातीतून सांगण्याचा प्रयत्न करेल, त्यावेळेस लक्षात ठेवा, तो कुठल्यातरी पक्षाला बांधील असेल. तुमची फक्त माथी भडकावण्यासाठी हे केलं जातं. तुम्ही एक येऊच नये, तुम्ही मराठी म्हणून एक होऊच नये म्हणून यासाठी हे प्रयत्न चालू असतात. मुळात विषय वेगळे असतात, मग असले विषय काढून तुम्हाला भरकवटलं जातं. तुम्हाला वेगळ्या विषयाकडे नेलं जातं. आम्ही तिकडे बघतो आणि बाकीचे इकडे काम आटपून घेतात. मधल्यामध्ये उद्योगपती गौतम अदाणींना जमीनपण दिली जाते. मुंबईचा विमानतळ अदाणींना दिला. नवी मुंबईचं विमानतळ अदाणींना, पालघरचं विमानतळ अदाणींना, तिथलं बंदर अदाणींना, अदाणी हुशार निघाला, आम्ही अडाणी निघालो”, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.
Raj Thackeray : औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातून हटवावी का? राज ठाकरे यांची रोखठोक भूमिका
“कित्येक गोष्टी आहेत ज्या विधानसभेत बोलल्या जाऊ नयेत. लाडकी बहीणचं काय झालं? काही नाही. ती योजना बंद होणार. मी निवडणुकीला सांगत होतो. पण माझं खरं सांगून पटलं नाही, त्यांनी खोटं सांगितलेलं पटलं. महत्त्वाच्या विषयांकडे दुर्लक्ष करायचं आणि नको तिकडे विषय भरकटवायचा. विधानसभेत चर्चा कशावर करायची? तर औरंगजेबावर”, अशीदेखील टीका राज ठाकरे यांनी केली.

