• Fri. Mar 20th, 2026
    Uddhav Thackeray : मनसेच्या गुढीपाडवा पोस्टरवर राज ठाकरेंनी चार पिढ्या दाखवल्या, उद्धव म्हणाले….

    Uddhav Thackeray on MNS Poster : मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याच्या तयारीदरम्यान शिवाजी पार्कमध्ये असलेल्या बॅनरवर ठाकरेंच्या चार पिढ्यांचे फोटो दिसले आहेत. उद्धव ठाकरेंनी यावर प्रतिक्रिया देताना बाळासाहेबांचा फोटो वापरल्याबद्दल गद्दारांचा उल्लेखही केला.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्याची तयारी सुरू आहे. यादरम्यान शिवाजी पार्कमध्ये मनसेच्या एका बॅनरवर ठाकरेंच्या चार पिढ्या पाहायला मिळत आहेत. यामध्ये प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांचे फोटो आहेत. अनेक वर्षांनी मनसेच्या बॅनरवर बाळासाहेब ठाकरेंचा फोटो नव्हता. याचं कारण म्हणजे राज ठाकरे यांनी शिवसेना पक्षा सोडल्यावर मनसे स्थापन केली होती. त्यावेळी बाळसाहेब स्वत: म्हणालेले की, माझा फोटो वापरायचा नाही, त्यानंतर मनसेच्या बॅनरवर फोटा दिसला नव्हता. मात्र यंदाच्या मेळाव्याआधी पार्कातील या बॅनरने अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं आहे. यावर उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

    सर्वांना बाळासाहेबांच्या नेतृत्त्वाखेरीसदुसरा पर्याय नाही हे त्यातून दिसत आहे. गेल्या वेळेला गद्दारांनीसुद्धा बाळासाहेबांनी फोटो वापरला तसं सगळ्यांच बाळासाहेबांचा फोटो वापरण्याशिवाय पर्याय राहिला नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली.

    कुणाल कामराच्या तिकडे जी काही तोडफोड झाली तिकडे शिवसेनेचा काडीचाही संबंध नाही. तिकडे गद्दार एसंशि सेनेने या सगळ्या गोष्टी केल्या. मुख्यमंत्र्यांनी बचाव कोणाचा केला, ज्याचं नाव घेतलं नाही त्याचा, पण ज्याचं नाव घेतलं त्याच्याबद्दल कोणीच काही बोललं नाहीये. एसंशि सेनेनी काय करायचं ते करूदे पण तुम्हाला जर वाटत असेल ‘एसंशि’ची बदनामी झाली असं जर वाटत असेल तर याचा अर्थ एसंशि गद्दार सेना असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.

    ‘सौगात ए सत्ता’ या निमित्ताने भारतीय जनता पक्ष जाहीर करणार का त्यांनी हिंदुत्त्व सोडलेलं आहे. जर तसं तो बोलणार नसतील तर तुम्ही कोणत्या तोंडाने आमच्यावर हिंदुत्त्व सोडल्याचा आरोप करताय. आम्ही तर आमच्या कामाने आणि कतृत्त्वाने जर मुस्लिम समाजाची मते मिळवत असू तर तुमच्या पोटात दुखायचं कारण काय? आता ज्या धर्मामध्ये धार्मिक विष पेरत आलात आता त्यांना तुम्ही घरोघरी जाऊन अन्न देत आहात. तुमचं नेककं काय? त्यांना विष द्यायचंय की अन्न हे एकदा सांगा, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी सौगात ए सत्तावरून भाजपवर टीका केली.

    हरिश मालुसरे

    लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed