• Fri. Mar 6th, 2026
    आयपीएल स्पर्धेत बेटिंग, मुंबई पोलिसांचा सहभाग, अंबादास दानवे यांच्या दाव्याने खळबळ

    Ambadas Danve On IPL Betting: आयपीएल २०२५ मध्ये होणाऱ्या बेटिंगबाबात अंबादास दानवे यांनी खळबळजनक आरोप केला आहे. मुंबई पोलिस विभागातील बड्या अधिकाऱ्यांचा या प्रकरणात समावेश असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

    महाराष्ट्र टाइम्स

    मुंबई: मुंबई पोलिस विभागातील बड्या अधिकाऱ्यांच्या मदतीने क्रिकेट स्पर्धेत मोठ्या प्रमाणात बेटिंग सुरू असल्याचा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी करीत त्या संभाषणाचा पेनड्राइव्हच सभापतींकडे सादर केला.

    मंगळवारी विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना दानवे यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. बेटिंग करणाऱ्यांमध्ये मेहुल जैन, कमलेश जैन आणि हिरेन जैन या व्यक्तींचा समावेश असून, त्यांच्याकडून पाकिस्तानी खेळाडूंचा यासाठी वापर केला जात असल्याचा गंभीर आरोपही विरोधी पक्षनेत्यांनी केला आहे. नुकत्याच पार पडलेल्या चॅम्पियन्स ट्रॉपीमध्ये ‘लोटस २४’ नावाच्या ॲपच्या माध्यमातून बेटिंग केल्यानंतर आता या सर्व व्यक्ती मुंबईत ‘आयपीएल’साठी आल्याची माहिती दानवे यांनी अंतिम आठवडावरील प्रस्तावावरील भाषणात सभागृहाला दिली.

    सिडको योजनेतील खारफुटीची २४७ हेक्टर क्षेत्र जमीन शेतकऱ्यांकडून सतीश अग्रवाल, कृष्णकुमार गोयल, राधेश्याम, चिप्पा रखमाजी आदींनी विकत घेतली. १८ जून २००८ ला हे प्रदूषित क्षेत्र म्हणून घोषित केले त्यानंतर आर्थिक सहाय्य नसल्यामुळे हा प्रकल्प रद्द केला होता. यात सिडकोचे तत्कालीन उपाध्यक्ष विजय सिंघल यांनी डी एसके लीगल सर्व्हिसेसची अवैध नेमणूक करून देयके दिल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी चौकशीची मागणी केली. औरंगजेबच्या कबरीच्या देखभालीसाठी साडेसहा लाख रुपये, तर सिंधुदुर्गमधील शिवरायांच्या मंदिरांच्या देखभालीसाठी २५० रुपये, तसेच नागपूरमध्ये झालेल्या दंगलीचा उल्लेख करताना इतर धर्मांचाही मान राखला पाहिजे, असे दानवे यांनी समारोप करताना म्हटले.

    राज्याच्या परिवहन, सिडको, महसूल, आरोग्य विभागातील घोटाळे, मंत्र्यावर असलेले भ्रष्टाचाराचे आरोप, अधिकाऱ्यांचे घोटाळे सादर करत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारचे वाभाडे काढले. नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगरमध्ये बलात्कराच्या घटनांचा आलेख वाढला असून, दररोज २२ बलात्कार, ४५ विनयभंगाच्या घटना घडत आहेत. कायद्याचा धाक नसल्यामुळे या सर्व घटना घडत असल्याचे दानवे म्हणाले.

    राज्याच्या परिवहन, सिडको, महसूल, आरोग्य विभागातील घोटाळे, मंत्र्यावर असलेले भ्रष्टाचाराचे आरोप, अधिकाऱ्यांचे घोटाळे सादर करत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारचे वाभाडे काढले. नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगरमध्ये बलात्कराच्या घटनांचा आलेख वाढला असून, दररोज २२ बलात्कार, ४५ विनयभंगाच्या घटना घडत आहेत. कायद्याचा धाक नसल्यामुळे या सर्व घटना घडत असल्याचे दानवे म्हणाले.

    नुपूर उप्पल

    लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed