Authored byसूरज सकुंडे | Contributed byआदित्य भवार | महाराष्ट्र टाइम्स.कॉम23 Mar 2025, 7:18 pm
औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मुद्द्यावरून आठवडाभरापूर्वी राज्यातील वातावरण चांगलंच तापलं होते. नागपूरमधील महाल भागाल काही समाजकंटकांकडून गैरप्रकार झाल्यामुळं तणावाची परिस्थिती निर्माण झाली होता. या घटनेनंतर पोलिसांनी संबंधित भागात संचारबंदी लागू केली होती. आज ही संचारबंदी पूर्णपणे उठवण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संचारबंदी उठवण्यामागचं कारण सांगितलं आहे.