• Tue. Mar 10th, 2026
    बळीराजासाठी Good News! कांद्याची निर्यात आता विनाअडथळा, निर्यात शुल्क हटवले; सरकारचा मोठा निर्णय

    Onion Export Duty Cut : बळीराजासाठी आनंदाची बातमी आहे. शेतकरी आणि शेतकरी संघटनांच्या लढ्याचं चीज झालं आहे. केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क हटविण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : बळीराजासाठी आनंदाची बातमी आहे. शेतकरी आणि शेतकरी संघटनांच्या लढ्याचं चीज झालं आहे. केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क हटविण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार आहे. १ एप्रिलपासून कांद्यावरील २० निर्यात शुल्कातून शेतकऱ्यांची सुटका होणार आहे. आणि बाजारपेठेत कांदा निर्यातीसाठी प्रोत्साहन मिळणार आहे.

    कांद्यावरील वाढीव निर्यात शुल्कामुळे शेतकऱ्यांची कांदा विक्रीवर रोख लागला होता. याचा मोठा फटका बळीराजाला बसला होता. यामुळे शुल्क हटवण्याची मागणी जोर धरु लागली. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा शुल्क हटवण्याचा निर्णय शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वागत केले आहे.

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एक्स हँडलवर पोस्ट करत म्हणाले, ‘केंद्र सरकारने कांद्यावरील २० टक्के निर्यात कर संपूर्णत: मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
    १ एप्रिल २०२५ पासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल. लासलगाव आणि पिंपळगाव येथून मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत असून, या निर्णयामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार आहे. हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेत महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना मोठा दिलासा दिल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा अत्यंत आभारी आहे.’

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed