• Sun. Mar 15th, 2026
    ठाण्यात उन्हाच्या झळांपासून रक्षण करण्यासाठी सिग्नलवर कापडी जाळीचे आच्छादन, महानगरपालिकेचा उपक्रम

    Thane Teen Hath Naka News : वाढत्या उन्हापासून काहीसा दिलासा मिळण्यासाठी तीन हात नाक्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवर जाळीचं आच्छादन टाकण्यात आलं आहे. नागपूर, पुण्यानंतर ठाण्यातही हा प्रयोग करण्यात आला आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    विनित जांगळे, ठाणे : उन्हाच्या तीव्र झळांनी ठाणेकर घामाघूम झालेले असताना ठाण्यातील मुख्य सिग्नलवर उन्हाच्या त्रासातून दिलासा मिळण्यासाठी कापडी जाळीचे आच्छादन टाकण्यात आले आहे. वाहन चालकांना सिग्नलच्या प्रतिक्षेत उभे असताना उन्हाचा त्रास जाणवू नये म्हणून ठाणे महानगरपालिकेतर्फे प्रायोगिक तत्वावर गोखले रोडवरून तीन हात नाक्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवर हे जाळीचे आच्छादन टाकण्यात आले असून नागपूर आणि पुणे शहरांनंतर ठाण्यात हा प्रयोग करण्यात आला आहे.

    मार्च महिन्यातच नागरिक उकाड्याने हैराण

    राज्यात उन्हाचा प्रकोप लक्षात घेता विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. मार्च महिन्यातच उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना अद्याप दोन ते अडीच महिने या उन्हाचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे ठाणे पालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार ठाण्यातील तीन हात नाका सिग्नल येथे कापडी जाळीचे आच्छादन टाकण्यात आहे. एखाद्या समारंभासाठी उभारल्या जाणार्‍या मंडपासारखी ही रचना असून ही जाळी १०० फूट लांब, २५ फूट रुंद आहे. तिची उंची रस्त्यापासून २० फूट इतकी असून या जाळीमुळे वाहन चालकांना उन्हापासून काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. विशेषत: दुचाकीस्वार आणि सायकलस्वारांना या आच्छादनामुळे सिग्नलवर उन्हापासून संरक्षण मिळणार आहे.
    Thane News : इमारतीत पाण्याची टाकी साफ करताना कर्मचार्‍याचा मृत्यू, घोडबंदरच्या आनंद नगरमधील दुर्दैवी घटना

    भविष्यात इतर ठिकाणीही सुविधा

    येत्या काळात आणखी काही ठिकाणी अशाप्रकारे जाळी उभारण्याचा ठाणे महानगरपालिकेचा मानस आहे. तीन हात नाका सिग्नलवर दीड ते दोन मिनिटे वाहनांना प्रतिक्षा करावी लागते. या काळात अशा उपाययोजनांमुळे ठाणेकरांचा उन्हापासून बचाव होणार आहे.
    Naresh Mhaske : कोकणाच्या सर्व गाड्यांना दिवा स्थानकावर थांबा मिळावा, दिवा-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन पुन्हा दादरपर्यंत; म्हस्केंनी संसदेत आवाज उठवला

    Thane News : ठाण्यात उन्हाच्या झळांपासून रक्षण करण्यासाठी सिग्नलवर कापडी जाळीचे आच्छादन, महानगरपालिकेचा उपक्रम

    ठाणेकरांनी व्यक्त केले समाधान

    नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून हा प्रयोग करण्यात आला होता. त्यानंतर पुण्यात विविध चौकांमध्ये २०१९ पासून असे छत उभारण्यात आले होते. आता या प्रयोगाचे ठाणेकरांनी कौतुक केले आहे.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed