• Sat. Jun 6th, 2026
    हिंसाचाराच्या घटनेनंतर देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये, पोलिस अधिकाऱ्यांसोबत बैठक

    Devendra Fadnavis News : नागपूरमध्ये मोठ्या हिंसाचाराची घटना घडली आहे. महाल भागात झालेल्या हिंसाचारात दगडफेक, जाळपोळ आणि पोलिसांवर हल्ले करण्यात आले. हिंसाचारानंतर काही भागांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली. आता देवेंद्र फडणवीस हे नागपूर दाैऱ्यावर आहेत. ते संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतील.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    नागपूर : औरंगजेबाच्या कबरीचा विषय सुरू असतानाच सोमवारी नागपूरमध्ये मोठ्या हिंसाचाराची घटना घडलीये. अजूनही नागपूरचे जनजीवन पूर्णपणे सुरळीत झाले नाहीये. नागपूरच्या महाल भागात हिंसाचार झाला. यावेळी मोठी दगडफेक आणि पेट्रोल बॉम्ब देखील फेकण्यात आली. रस्त्यावरील गाड्यांचीही तोडफोड करण्यात आली. फक्त हेच नाही तर पोलिसांना या हिंसाचारामध्ये थेट टार्गेट करण्यात आले. काही ठिकाणी जमावाकडून जाळपोळ करण्यात आली. महिला पोलिसांसोबत चुकीचे वर्तनही करण्यात आले.

    मुख्यमंत्री घेणार वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक

    अनेक पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचारी गंभीर जखमी झाल्याचे बघायला मिळाले. या घटनेनंतर नागपूरमध्ये अनेक काही भागांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली. या हिंसाचारावेळीचे काही फोटो आणि व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. हा पूर्वनियोजित कट असल्याचाही दावा केला जात आहे. फक्त हेच नाही तर या हिंसाचाराचा संबंध बांगलादेशशी असल्याचे सांगितले जाते. तशा काही सोशल मीडियावर पोस्ट मिळाल्या आहेत.
    Ajit Pawar : ‘आपण ठराविक समाजाचे मंत्री नाहीत, तारतम्य ठेवून…’, अजित पवार यांनी नितेश राणेंना सुनावलं देवेंद्र फडणवीस हिंसाचारानंतर पहिल्यांदाच नागपूरात

    नागपूरमधील हिंसाचारानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चांगलेच अॅक्शन मोडमध्ये आल्याचे बघायला मिळाले. हिंसाचार घडवणाऱ्या कोणालाही सोडणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सोमवारी झालेल्या या हिंसाचाराच्या घटनेनंतर पहिल्यांच आज देवेंद्र फडणवीस हे नागपूरला जात आहेत. यावेळी ते या हिंसाचाराबद्दल माहिती घेणार आहेत. हिंसाचारानंतर फडणवीस हे नागपूरला जात असल्याने त्यांच्या या दाैऱ्याला महत्व प्राप्त झाले आहे.

    मुख्य सूत्रधार फहीम खानचा जामिनासाठी अर्ज

    मुख्यमंत्र्यांनी नागपूरमधील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. यावेळी ते सध्या परिस्थिती नेमकी कशी आहे हे जाणून घेतील, दुसरीकडे नागपूर हिंसाचाराचा मुख्य सूत्रधार फहीम खान याने जामिनासाठी अर्ज दाखल केलाय. नागपूर हिंसाचाराचा मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप हा फहीम खानवर आहे. त्यानेच हा संपूर्ण कट घडवल्याचा आरोप आहे. तो काही दिवसांपूर्वीच मालेगावला गेल्याचेही सांगितले जाते. फहीम खानला वैद्यकीय कारणामुळे न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.

    शितल मुंढे

    लेखकाबद्दलशितल मुंढेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. राजकीय, मनोरंजन, शिक्षण आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. लोकमत आणि टीव्ही 9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 6 वर्षांचा अनुभव.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed