Nashik News: तरुणीने आई-वडिलांच्या इच्छेविरोधात २० जानेवारी २०२५ रोजी गावातीलच वैभव पवार या तरुणाशी वैदिक पद्धतीने विवाह केला. ती त्याच्यासोबतच राहत असताना अचानक दोघांमध्ये किरकोळ भांडण झाले.
पांगरी येथील एका १९ वर्षीय तरुणीने आई-वडिलांच्या इच्छेविरोधात २० जानेवारी २०२५ रोजी गावातीलच वैभव अण्णासाहेब पवार (वय २३) या तरुणाशी वैदिक पद्धतीने विवाह केला. ती त्याच्यासोबतच राहत असताना अचानक दोघांमध्ये किरकोळ भांडण झाले. त्यातून ती माहेरी आली. ती पुन्हा सासरी येत नसल्याचे बघून नवऱ्याने तीन मित्रांना सोबत घेत बुधवारी (दि.१९) दुपारी १२.३० वाजता पांगरी बसस्थानक परिसरात ही मुलगी आई आणि भावासोबत पायी जात असताना आईला ढकलून देत मुलीला कारमध्ये घालून तीचे अपहरण केले. दरम्यान, अपहरणाचा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला. वावी पोलिसांना या संदर्भात माहिती देण्यात आल्यानंतर त्यांच्याकडूनही तपास चक्र वेगाने फिरली. अशातच तरुणाने या मुलीला प्रारंभी संगमनेर येथे कारने नेत तेथे तिला उतरून घेत तीन मित्रांना कारसह माघारी पाठवून दिले. त्यानंतर या पती-पत्नीने बसने लोणी आणि नंतर शिर्डी येथे प्रवास केला.
समृद्धी महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; १ एप्रिलपासून टोलमध्ये मोठी वाढ
तिथून ते गावी परतत असताना वावी पोलिसांनी त्यांचे लोकेशन ट्रॅक करीत शिर्डी येथून त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर मुलीच्या फिर्यादीवरून नवऱ्याविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला. या संदर्भात वावी पोलिसांनी वैभवला अटक केली असून, त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, पत्नीच गजाआड असलेल्या पतीला जेवणाचा डबा घेऊन आल्याने पोलिसांवर डोक्यावर हात मारून घेण्याची वेळ आली.
गोहत्येच्या गुन्हेगारांवर यापुढे मकोका; CM देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत घोषणा
‘त्या’ मित्रांचा शोध सुरु…
अपहरण करण्यासाठी मदत करणाऱ्या वैभवचे तीन मित्र या प्रकरणात पोलिसांसमोर आरोपी म्हणून उभे टाकले आहेत. या दोघांचा संसार सुरळीत चालावा म्हणून मदतीच्या भावनेने गेलेले ते तीन मित्र पोलिसांच्या लेखी अपहरणातील आरोपी झाले आहेत. त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक गणेश शिंदे यांनी दिली.

