• Thu. Mar 19th, 2026

    Ajit Pawar : ‘आपण ठराविक समाजाचे मंत्री नाहीत, तारतम्य ठेवून…’, अजित पवार यांनी नितेश राणेंना सुनावलं

    Ajit Pawar : ‘आपण ठराविक समाजाचे मंत्री नाहीत, तारतम्य ठेवून…’, अजित पवार यांनी नितेश राणेंना सुनावलं

    Ajit Pawar on Nitesh Rane : “आपण ठराविक समाजाचे मंत्री नाही. आपण पूर्ण चांद्यापासून बांद्यापर्यंतचे संपूर्ण महाराष्ट्राचे मंत्री आहोत. त्यात कुणी चुकीचं वागत असेल तर कायद्याचा बडगा दाखवून त्याला शासन करा. कायदा कुणीच हातात घ्यायचा कारण नाही”, असं अजित पवार म्हणाले.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्री नितेश राणे यांना घरचा आहेर दिला आहे. आपण कोणत्याही एका समाजाचे मंत्री नसून संपूर्ण राज्याचे मंत्री आहोत. त्यामुळे तारतम्य ठेवून वक्तव्य केलं पाहिजे. आपण राज्याच्या 13 कोटी जनतेचे मंत्री आहोत, याचं भान ठेवलं पाहिजे, अशा शब्दांत अजित पवारांनी नितेश राणे यांना सुनावलं आहे. ते एबीपी माझाच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी नितेश राणेंच्या प्रश्नावर सविस्तर भूमिका मांडली. “आपण ज्यावेळेस मंत्री म्हणून काम करतो त्यावेळेस कोणत्याही गटाचा, पक्षाचा असला तरी त्याने वक्तव्य करत असताना तारतम्य ठेवून वक्तव्य केलं पाहिजे”, असं अजित पवार म्हणाले.

    “आपल्या वक्तव्यामुळे आपल्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल, त्यातून पोलीस दलाला आधीच भरपूर कामे असतात. त्यात हे नवीन काम आणखी त्यांच्या पाठीमागे लागेल. असं करु नये. आम्ही राज्य चालवतो, सरकार म्हणून आम्ही कार करतो. त्यावेळेस आम्ही या गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे की, आपल्यावर 13 ते साडे 13 कोटी जनतेची जबाबदारी आहे”, असं अजित पवार म्हणाले.

    ‘तर कायद्याचा बडगा दाखवून त्याला शासन करा’

    “आपण ठराविक समाजाचे मंत्री नाही. आपण पूर्ण चांद्यापासून बांद्यापर्यंतचे संपूर्ण महाराष्ट्राचे मंत्री आहोत. त्यात कुणी चुकीचं वागत असेल तर कायद्याचा बडगा दाखवून त्याला शासन करा. त्यावर अॅक्शन घ्या. कायदा कुणीच हातात घ्यायचा कारण नाही. कुणी चुकीचं वक्तव्य करुन कुणाच्या भावना भडकवण्याचे प्रयत्न करत असेल, सोशल मीडियाचा वापर करुन काही वेगळे मेसेज पसरवण्याचा प्रयत्न करत असेल, त्यातून कुणाच्या भावना दुखावल्या जात असतील तर, जो दुखवतोय त्यावर जरुर कारवाई करा. त्याबद्दल दुमत नाहीच”, अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली.
    Chitra Wagh यांचा मोठा गौप्यस्फोट, उद्धव ठाकरेंकडून पक्षप्रवेशाची ऑफर
    “आता एवढं चांगलं बहुमत आहे. लोकांनी लोकांची जबाबदारी पार पाडलेली आहे. आपण 5 वर्षे व्यवस्थितपणे राज्याला प्रगतीकडे घेऊन जाऊयात. देशात विकासाच्या बाबतीत नंबर एकच राज्य म्हणून महाराष्ट्राची जी ओळख आहे, ती अधिकक दृढ कशी होईल, हा प्रयत्न करुयात, असं माझं म्हणणं आहे”, असं अजित पवार म्हणाले.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed