Ajit Pawar on Nitesh Rane : “आपण ठराविक समाजाचे मंत्री नाही. आपण पूर्ण चांद्यापासून बांद्यापर्यंतचे संपूर्ण महाराष्ट्राचे मंत्री आहोत. त्यात कुणी चुकीचं वागत असेल तर कायद्याचा बडगा दाखवून त्याला शासन करा. कायदा कुणीच हातात घ्यायचा कारण नाही”, असं अजित पवार म्हणाले.
“आपल्या वक्तव्यामुळे आपल्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल, त्यातून पोलीस दलाला आधीच भरपूर कामे असतात. त्यात हे नवीन काम आणखी त्यांच्या पाठीमागे लागेल. असं करु नये. आम्ही राज्य चालवतो, सरकार म्हणून आम्ही कार करतो. त्यावेळेस आम्ही या गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे की, आपल्यावर 13 ते साडे 13 कोटी जनतेची जबाबदारी आहे”, असं अजित पवार म्हणाले.
‘तर कायद्याचा बडगा दाखवून त्याला शासन करा’
“आपण ठराविक समाजाचे मंत्री नाही. आपण पूर्ण चांद्यापासून बांद्यापर्यंतचे संपूर्ण महाराष्ट्राचे मंत्री आहोत. त्यात कुणी चुकीचं वागत असेल तर कायद्याचा बडगा दाखवून त्याला शासन करा. त्यावर अॅक्शन घ्या. कायदा कुणीच हातात घ्यायचा कारण नाही. कुणी चुकीचं वक्तव्य करुन कुणाच्या भावना भडकवण्याचे प्रयत्न करत असेल, सोशल मीडियाचा वापर करुन काही वेगळे मेसेज पसरवण्याचा प्रयत्न करत असेल, त्यातून कुणाच्या भावना दुखावल्या जात असतील तर, जो दुखवतोय त्यावर जरुर कारवाई करा. त्याबद्दल दुमत नाहीच”, अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली.
Chitra Wagh यांचा मोठा गौप्यस्फोट, उद्धव ठाकरेंकडून पक्षप्रवेशाची ऑफर
“आता एवढं चांगलं बहुमत आहे. लोकांनी लोकांची जबाबदारी पार पाडलेली आहे. आपण 5 वर्षे व्यवस्थितपणे राज्याला प्रगतीकडे घेऊन जाऊयात. देशात विकासाच्या बाबतीत नंबर एकच राज्य म्हणून महाराष्ट्राची जी ओळख आहे, ती अधिकक दृढ कशी होईल, हा प्रयत्न करुयात, असं माझं म्हणणं आहे”, असं अजित पवार म्हणाले.

