• Fri. Mar 6th, 2026

    दादा भुसे निर्णय मागे घ्या! उन्हाळ्यात एकाच वेळी परीक्षा घेण्याच्या निर्णयावर पालक, शिक्षकांची टीका

    दादा भुसे निर्णय मागे घ्या! उन्हाळ्यात एकाच वेळी परीक्षा घेण्याच्या निर्णयावर पालक, शिक्षकांची टीका

    Dada Bhuse: ऐन उन्हाळ्यात राज्यातील इयत्ता पहिली ते नववीच्या वार्षिक परीक्षा आणि ‘पेंट’ परीक्षा एकाचवेळी घेण्याच्या निर्णयावर पालक आणि शिक्षकांनी सडकून टीका केली आहे.

    महाराष्ट्र टाइम्स
    dada bhuse1

    म. टा. प्रतिनिधी, पुणे: ऐन उन्हाळ्यात राज्यातील इयत्ता पहिली ते नववीच्या वार्षिक परीक्षा आणि ‘पेंट’ परीक्षा एकाचवेळी घेण्याच्या निर्णयावर पालक आणि शिक्षकांनी सडकून टीका केली आहे. सर्वांना मनस्ताप देणारा निर्णय मागे घ्यावा, असे मत नागरिकांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’कडे व्यक्त केले आहे.

    राज्यातील शाळांमध्ये वार्षिक परीक्षांची तयारी झाल्यावर ‘एससीईआरटी’ चे संचालक राहुल रेखावार यांनी विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा आणि ‘पेंट’ परीक्षा आठ ते २५ एप्रिल या कालावधीत घेण्याचा फतवा काढला. या फतव्याच्या विरोधात ‘महाराष्ट्र टाइम्स’ ने वृत्ताद्वारे प्रकाश टाकला आणि नागरिकांची मते जाणून घेतली. वाढते तापमान, ग्रामीण भागातील शाळांची परिस्थिती, शाळांच्या सोयीसुविधा, मुलांच्या सुट्ट्या, पालकांचे सुट्टट्यांचे नियोजन, निकाल तयार करण्यासाठी अपुरा कालावधी अशा सर्वांचा विचार निर्णयाचा पुनर्विचार करावा. शाळांना विद्याथ्यांच्या परीक्षा एप्रिल महिन्याच्या १० तारखेपर्यंत संपवण्याची मुभा द्यावी, अशी भूमिका मांडली आहे.
    Parbhani Violence: सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू पोलिस मारहाणीतच! न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालात ठपका
    शिक्षण विभागाने परीक्षा ऐन उन्हाळ्यात घेण्याचा निर्णय घेणे हे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला हानीकारकच आहे. गेल्या वर्षीच ‘सीबीएसई’च्या एप्रिलमध्ये भरणाऱ्या शाळांनीही तापमानवाढ लक्षात घेऊन १६ एप्रिलनंतर सुट्ट्या जाहीर केल्या होत्या. शिक्षकांना यंत्र समजून हा आदेश काढणाऱ्यांनी स्वतः २५ एप्रिलला झालेल्या परीक्षेचे पेपर तपासून एक मे रोजी निकाल लावून दाखवावा. शिक्षक व विद्यार्थ्यांचा थोडाही विचार न करता काढलेला हा आदेश त्वरित रद्द करावा. – सुजाता भडभडे, पालक
    Ladki Bahin Yojana:’या’ लाडक्या बहिणींना मिळणार वाढीव मदत; अजित पवाराचं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?
    शालेय परीक्षेची वेळ वाढविणे अत्यंत अप्रासंगिक ठरेल, वेळापत्रकानुसार परीक्षा १२-१३ एप्रिलपर्यंत संपतील; परंतु नवीन वेळापत्रकामुळे ती २५ एप्रिलपर्यंत वाढविण्यात येणार आहे. शिक्षणमंत्री दादा भुसे यांना विनंती आहे, की त्यांनी या प्रकरणात लक्ष घालावे आणि परीक्षेची वेळ मागील कालमर्यादेनुसार ठेवण्यासाठी निर्णय घ्यावा. –राजेंद्र पवार, पालक
    गोहत्येच्या गुन्हेगारांवर यापुढे मकोका; CM देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत घोषणा
    नवीन वेळापत्रकाची अंमलबजावणी योग्य नियोजनाशिवाय न केल्याने विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना त्रास सहन करावा लागत आहे. भविष्यात असे बदल करण्यापूर्वी पुरेशी पूर्वतयारी, विद्यार्थी आणि शिक्षकांचा सहभाग; तसेच नियोजनबद्ध अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. यंदाच्या वर्षी शाळांना स्वातंत्र्य देऊन त्यांच्या वेळापत्रकानुसार परीक्षा घेऊ द्याव्यात. – सौरभ धडफळे, पालक

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed