• Sun. Aug 16th, 2026

केंद्र सरकारची ‘नेत्रज्योती’ अंतर्गत मोहीम, तीन वर्षात २५ लाख जणांना दृष्टिदिलासा

केंद्र सरकारची ‘नेत्रज्योती’ अंतर्गत मोहीम, तीन वर्षात २५ लाख जणांना दृष्टिदिलासा

Cataract surgery Marathi News : मोतिबिंदू नियंत्रणासाठी महाराष्ट्रात तीन वर्षांत २५ लाख ६९ हजार ७५३ मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या. राष्ट्रीय नेत्रज्योती अभियानांतर्गत या मोहीमेत मोतीबिंदूचे निदान व उपचार करण्यात आले. अद्याप २०२२ ते २०२५ पर्यंत २७ लाख शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट आहे. याअंतर्गत आरोग्य विभागाने जिल्हानिहाय नियोजन केले असून, सरकारी व खासगी संस्थांचे सहकार्य घेतले जात आहे.

महाराष्ट्र टाइम्स

म.टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : अंधत्व व दृष्टिक्षीणता नियंत्रण कार्यक्रमातंर्गत राज्यात विनाशुल्क मोतिबिंदू शस्त्रक्रिया मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेतंर्गत तीन वर्षांत सार्वजनिक आरोग्य विभागाने २५ लाख ६९ हजार ७५३ मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. डोळ्यांची निगा न राखणे, डोळ्यांवर सातत्याने वाढणारा ताण, दृष्टी धूसर होणे, मोतिबिंदू तयार झाल्यावरही योग्यवेळी शस्त्रक्रिया न करण्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत.

केंद्र सरकारकडून राष्ट्रीय नेत्रज्योती अभियान ही विशेष मोहीम जून २०२२ पासून राबवण्यात येते. या मोहिमेत ५० किंवा त्याहून अधिक वयाच्या नागरिकांमध्ये अंधत्व तसेच गंभीर दृष्टिक्षीणता ( एसव्हीआय) कारणीभूत असलेल्या मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमातंर्गत सन २०२२-२३, २०२३-२४ व २०२४-२५ या तीन वर्षांत २७ लाख मोतिबिंदू शस्त्रक्रियांचे उदिष्ट राज्याला देण्यात आले होते. त्यानुसार २४ डिसेंबरपर्यंत २५ लाख ६९ हजार ७५३ शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे. मागील वर्षी जानेवारी ते डिसेंबर २०२४ या कालावधीत ७,५१,५०७ मोतिबिंदू शस्त्रक्रिया करून एकूण उद्दिष्टाच्या ७० टक्के शस्त्रक्रिया केल्या. या कालावधीत १० लाख ८७ हजार इतक्या मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते.

संस्थांचे सहकार्य

या मोहिमेंतर्गत दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शासकीय आरोग्य संस्थांसह, अशासकीय स्वयंसेवी संस्था तसेच खासगी संस्थांचे सहकार्य घ्यावे. तसेच यासंदर्भात कोणताही सल्ला घेण्यासाठी १०४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. या मोहिमेंतर्गत शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आरोग्य विभागाने जिल्हानिहाय नियोजन केले असून संबधित आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना याची जबाबादरी देण्यात आली आहे. राष्ट्रीय नेत्र ज्योती अभियान ही विशेष मोहीम जून २०२२ पासून राबवण्यात येते. या मोहिमेमध्ये पन्नास किंव त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींमध्ये अंधत्व आणि एसव्हीआय कारणीभूत असलेल्या मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येतात.

हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव.आणखी वाचा

‘वंदे मातरम्’ वेळी सोनिया गांधींनी खर्गेंसाठी खुर्ची मागितली, भाजपचा संताप, ‘गांधी घराण्याला संपूर्ण गायनाबाबत एवढी अस्वस्थता का?’
हे मुंढे कोण आहेत? रिझर्व्हेशन लिस्टमध्ये नाव पाहताच रेस्टॉरंट चालक चपापले, मित्राचा फोन, तुकाराम मुंढेंच्या मुलाचा भन्नाट किस्सा
Central Railway : ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर कोकण अन् उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांना फटका; महत्त्वाच्या तीन गाड्या बंद, अडचणींचं कारण पुढे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed