Ganesh Naik Statement : गेल्या काही दिवसांपासून ठाण्यात जनता दरबारवरुन महायुतीत वेगळं राजकारण सुरु असल्याचं बघायला मिळत आहे. एकनाथ शिंदे हे ठाण्याचे पालकमंत्री आहेत. असं असतानाही गणेश नाईक यांच्याकडून ठाण्यात जनता दरबार सुरु करण्यात आला. त्यानंतर गणेश नाईक यांनी आज एक मोठं वक्तव्य केलं आहे.
भाजपचे मंत्री गणेश नाईक यांनी आज आपल्या भाषणात आपण ठाण्यातील सर्वात जास्त सिनीयर नेते असल्याचं म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. ठाण्यात सर्वात जास्त सिनीयर मंत्री मी आहे, असं गणेश नाईक म्हणाले आहेत. मी कधी कुणाची जात विचारत नाही. माझी जात कुणी विचारलं तर मी अभिमानाने सांगतो, असंही ते म्हणाले.
Ravikant Tupkar : बुलढाणा पोलिसांची नोटीस, रविकांत तुपकर आक्रमक; म्हणाले, ‘त्याचे गंभीर परिणाम…’
गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
“मी 1990 ला आमदार झालो. ठाण्यात सर्वाज जास्त सीनीयर म्हणजे 4 वेळा झालेला मंत्री मी एकटाच आहे. समाजाने ते घडवलं. समाज म्हणजे नुसता आगरी समाज नाही. मी कधीही कुणाची जात विचारत नाही. कुणाी कुणाची जात विचारु नये. कुणी जात विचारली तर स्टाईलमध्ये सांगायचं की, मी आगरी आहे. पण आपण दुसऱ्याची जात विचारु नये आणिआपल्याला कुणी जात विचारु नये”, असं गणेश नाईक म्हणाले. “स्पर्धा ही सकारात्मक आणि गुणात्मक असली पाहिजे. द्वेषाची स्पर्धा असता कामा नये. जे लोकं द्वेषाच्या स्पर्धेत गुंततात त्यांची प्रगतीच होत नाही”, असंदेखील मत गणेश नाईक यांनी यावेळी मांडलं.
Anil Deshmukh : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मोठी रणनीती, अनिल देशमुख यांनी आतली बातमी फोडली
जनता दरबारवरुन राजकारण
गेल्या काही दिवसांपासून ठाण्यात जनता दरबारवरुन महायुतीत वेगळं राजकारण सुरु असल्याचं बघायला मिळत आहे. एकनाथ शिंदे हे ठाण्याचे पालकमंत्री आहेत. असं असतानाही गणेश नाईक यांच्याकडून ठाण्यात जनता दरबार सुरु करण्यात आला. त्यामुळे या जनता दरबारची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली. विशेष म्हणजे शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते नरेश म्हस्के यांनी नाईक पालकमंत्री असलेल्या पालघर जिल्ह्यात शिवसेनेकडूनही जनता दरबार सुरु केला जाईल, असं जाहीरपणे म्हटलं. त्यामुळे ठाण्यात महायुतीमधील एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यात एक वेगळीच राजकीय चुरस सुरु असल्याची चर्चा आहे.

