Badlapur to Karjat Third and Fourth Line : बदलापूर ते कर्जत मार्गावर तिसरी आणि चौथी लाईन टाकण्याचा निर्णय सरकारने घेतला असून यामुळे प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.
बदलापूर ते कर्जत तिसरी आणि चौथी लाईन
या प्रकल्पामुळे बदलापूर, वांगणी, शेलू, नेरळ, भिवपुरी आणि कर्जत शहरांना या प्रकल्पाचा मोठा फायदा होणार आहे. पंतप्रधान गती शक्ती योजनेंतर्गत (Prime Speed Power) याला मंजुरी देण्यात आली आहे.
मुंबईकरांसाठी गुज न्यूज; या वर्षात सुरू होणार तीन महत्त्वाचे पूल… विक्रोळी, अंधेरी आणि दक्षिण मुंबईत होणार मोठा फायदा
बदलापूर ते कर्जत या मार्गावर तिसरी आणि चौथी लाईन तयार केली जाणार आहे. यासाठी १५१० कोटी रुपये खर्च करुन हा मार्ग बांधण्यात येणार आहे. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन (MRVC) हा प्रकल्प राबवत आहे. या प्रकल्पाचा खर्च केंद्र आणि महाराष्ट्र सरकार ५०:५० च्या प्रमाणात उचलतील. यामुळे प्रवाशांचा प्रवास सुकर होईल आणि आर्थिक प्रगतीला गती मिळेल.
बदलापूर – कर्जत रेल्वे मार्गाच्या विस्ताराचा कसा होणार फायदा?
या मार्गामुळे स्थलांतरित वाहतूक आणि माल वाहतुकीच्या वाढत्या गरजा पूर्ण केल्या जातील. बदलापूर, वांगणी, शेलू, नेरळ, भिवपुरी, कर्जत या शहरांना जलद आणि चांगली रेल्वे सेवा मिळणार आहे.
मालगाडी अंगावरुन गेली, तरी महिला जिवंत बाहेर, सोलापुरात सफाई कर्मचाऱ्याच्या सल्ल्यामुळे वाचला जीव
मल्टी-मॉडल कनेक्टिव्हिटी आणि लॉजिस्टिकची कार्यक्षमता सुधारेल.
बदलापूर ते कर्जत तिसरी आणि चौथी लाईन १५१० कोटी रुपयांच्या प्रकल्पांतर्गत बांधली जात आहे. मुंबई नागरी परिवहन प्रकल्प (MUTP) फेज-3A अंतर्गत, मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन (MRVC) १४ किमी लांबीचा हा तिसरी आणि चौथी लाईन प्रकल्प राबवत आहे.
Central Railway : मध्य रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी, बदलापूर ते कर्जत मार्गावरील प्रवास सोपा होणार; सरकारची मोठी घोषणा
नवीन रेल्वे मार्गामुळे प्रवाशांचा प्रवास सुलभ होईल, वेळ कमी होईल आणि सामाजिक आणि आर्थिक प्रगतीला गती मिळेल.

