• Sun. Mar 8th, 2026
    दोन गटांमध्ये गरम निखारे फेकून युद्ध, होळीच्या दिवशीच…

    Mahad Dev Danav Tradition : पूजा केल्यानंतर होम लावल्यानंतर जळकी लाकडं एकमेकांच्या अंगावर फेकण्याची परंपरा यालाच देव दानवाचे युद्ध असे म्हटले जाते. होमच्या दोन्ही बाजूला दोन्ही बाजूकडील रहिवासी एकत्र येतात. आणि हातातील पेटतं लाकूड समोरील रहिवाशांच्या अंगावर फेकतात.

    Lipi

    अमुलकुमार जैन, रायगड : कोकणात शिमगा उत्सवाला सुरुवात झालेली आहे. या शिमग्यात कोकणात विविध ठिकाणी अनेक खेळ खेळले जातात. आणि असाच शिमगा कोकणात विविध परंपरेने चालू असतो. आणि त्यातीलच एक वैशिष्ट्य म्हणजे महाड मधील देव-दानव युद्धाची परंपरा. खरंतर ही परंपरा कोकणामध्ये दोन ठिकाणी साजरी केली जाते. एक म्हणजे चिपळूण मधील सावर्डे या गावात आणि दुसरी म्हणजे महाड मधील गवळीआळी या ठिकाणी हे देव दानव युद्ध खेळलं जातं.

    रायगड जिल्ह्यातील महाड शहरामध्ये गवळीआळी येथे प्रथेप्रमाणे होळी उत्सव सण साजरा केला जातो. होळी उत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी देव- दानवाच्या युद्धाची परंपरा कायम आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गवळी येथे ही परंपरा चालू आहे. प्रथम, सालाबादप्रमाणे होळी दहन केली जाते. व नंतर दोन गटांमध्ये म्हणजेच देव आणि दानव युद्ध सुरू होते. सर्व ग्रामस्थ एकमेकांच्या अंगावर जळके लाकूड फेकून ही परंपरा कायम करून होळी उत्सव सण मोठ्या उत्साहात साजरा करतात.

    पूजा केल्यानंतर होम लावल्यानंतर जळकी लाकडं एकमेकांच्या अंगावर फेकण्याची परंपरा यालाच देव दानवाचे युद्ध असे म्हटले जाते. होमच्या दोन्ही बाजूला दोन्ही बाजूकडील रहिवासी एकत्र येतात. आणि हातातील पेटतं लाकूड समोरील रहिवाशांच्या अंगावर फेकतात. शेकडो पेटती लाकडं एकमेकांच्या अंगावर फेकली जातात. या युद्धात कोणालाही भाजत नाही. अथवा कोणीही जखमी होत नाही हे विशेष आहे. हा खेळ पहाण्यासाठी नागरिक गर्दी करत असतात.

    देव – दानव युद्ध परंपरा आजही टिकून

    होळीसाठी वस्तूरुपी ठेवलेला प्रसाद आळीतील एक विशिष्ट गट होळी लागताच पळवतो. त्यामुळे आळीतील दुसऱ्या गटाला हा प्रसाद मिळत नाही. म्हणून प्रसाद घेऊन गेलेला गट दानव होतो, तर प्रसाद न मिळालेला गट देव. यानंतर या दोन्ही गटामध्ये युद्धास सुरवात होते. हे दोन्ही गट एकमेकांवर होळीमधील जळती लाकडं फेकतात आणि गेल्या अनेक वर्षांपासूनची युद्ध स्वरूप प्रथा पार पडते. विशेष म्हणजे आजपर्यंत यात कुणालाही कोणत्याही प्रकारची ईजा किंवा कोणताही घातपात झालेला नाही, हाही एक इतिहासच आहे.
    हे देव – दानव युद्ध बघण्यासाठी संपूर्ण महाडकर आतुरतेने गवळ आळीत दरवर्षी गर्दी करतात आणि या प्रथेचा आनंद घेतात.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed