Authored byसूरज सकुंडे | Contributed byप्रसाद रानडे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम14 Mar 2025, 4:03 pm
राजापूर मध्ये दोन गटांमध्ये झालेल्या वादावरून निलेश राणे यांनी भाष्य केलं आहे.राजापूर मध्ये मध्येही असं काही झालेलं नाही, वातावरण भडकवण्याचा प्रयत्न करू नका, असं निलेश राणे म्हणाले.वेळ आली तर मी स्वतः रस्त्यात उतरून उभा राहीन, असंही निलेश राणे म्हणाले. कोकणात असं काही घडू देणार नाही, असंही निलेश राणे म्हणाले.