• Sat. Mar 7th, 2026

    Sanjay Raut : ‘…तर मग गटार गंगेमध्ये लोकांना का डुबकी मारायला लावली’; संजय राऊत आक्रमक, सरकारला सवाल

    Sanjay Raut : ‘…तर मग गटार गंगेमध्ये लोकांना का डुबकी मारायला लावली’; संजय राऊत आक्रमक, सरकारला सवाल

    Sanjay Raut Press Conferene : राज्य सरकारने होळी सणाच्या डीजेवर बंदी घालणारा निर्णय घेतला आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली आहे व पर्यावरणाच्या मुद्द्यावर प्रश्न विचारला आहे. गणेशोत्सव आणि इतर सणांवरही बंदी येणार याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. राज्याच्या कर्जाच्या वाढत्या ओझ्याबाबतही त्यांनी सरकारला प्रश्न विचारले आहेत.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : राज्य सरकारने होळी सणाला डीजेवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी अनेक ठिकाणी पत्र तर काही ठिकाणी तोंडी सूचना दिली आहे. यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी थेट राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. त्यासोबतच पर्यावरणाची एवढी काळजी आहे तर गटार गंगेमध्ये का डुबकी मारायला लावली असा सवाल राऊतांनी सरकारला केला आहे.

    होळीला परवानगी मिळत नाही, आता गणेशोत्सव येणार आहेत, पीओपींच्या मुर्तींवर बंदी आणलेली आहे. वर्षातून एकदा येणाऱ्या सणावर बंगी आणता हे कसलं हिदुत्त्व? याआधी असं कधी झालं नव्हतं. आमच्या राज्यामध्ये हिंदूंचे सण खुल्या वातावरणात होतील असे सांगत होते मग आता काय झालं? गणपती, दिवाळीमध्ये फटाक्यांवर बंधन आहेत. पर्यावरणाची इतकीच काळजी आहे मग गढूळ पाण्यामध्ये महाकुंभला लोकांना का स्नान करायला लावलं. गटार गंगेमध्ये लोकांना का डुबकी मारायला लावली, असं संजय राऊत म्हणाले.

    आता कर्ज काढून राज्य चालवलं जात आहे. राज्यावरचं कर्जाचं ओझं दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. लाडकी बहीण योजना आता बंद करतील, शिधा योजना आणि गरिबांच्या अशा अनेक योजना बंद केल्या. कर्ज काढून निवडणुकांत मत विकत घेतं. राज्याची तिजोरी महिलांची मते विकत घेण्यासाठी वापरली, जाहीरनाम्यामध्ये ज्या प्रमुख घोषणा आहेत. लाडक्या बहीणींना २१०० रूपये आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी याचं काय करणार आहात याचं उत्तर राज्याच्या जनतेला मिळयला हवं. आठ लाख हजार कोटींच्या कर्जाचा डोंगर कसा कमी करणार आहात? असा सवालही राऊतांनी महायुती सरकारला केलाय. यावेळी बोलताना पाकिस्तानात झालेल्या ट्रेन हायजॅकमध्ये भारताचा हात असल्याचा आरोप पाकिस्तानने केलाय. यावरही राऊतांनी उत्तर दिलं आहे.

    भारताचा अशा मोठ्या कांडामध्ये हात असता तर महाराष्ट्र आणि देशातील अनेक प्रकरण सहज सोडवली असतील. इतकं धाडस असतं तर चीनने ताब्यात घेतलेली ४००० वर्ग किमी जमीन सोडवली असती. अरूणाचलमधून चीनला हिसकावून लावलं असतं. हा पाकिस्तानचा अत्यंत अंतर्गत विषय आहे त्यांना तो अंतर्गत पद्धतीने सोडवायला पाहिजे, असं असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

    हरिश मालुसरे

    लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed