• Sat. Jun 6th, 2026

    Anjali Damania : ‘धनंजय मुंडेंच्या कार्यालयातून तब्बल 6 वेळा खंडणी मागण्यात आली’, अंजली दमानिया यांचा धक्कादायक दावा

    Anjali Damania : ‘धनंजय मुंडेंच्या कार्यालयातून तब्बल 6 वेळा खंडणी मागण्यात आली’, अंजली दमानिया यांचा धक्कादायक दावा

    Anjali Damania on Dhananjay Munde : “धनंजय मुंडेंच्या जगमित्र या कार्यालयातून आवादा कंपनीकडे एक-दोन वेळा नाही, तर तब्बल 6 वेळा खंडणी मागण्यात आली, असा आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याने जबाब दिला आहे”, असा धक्कादायक दावा अंजली दमानिया यांनी केला आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबत मोठा आणि धक्कादायक दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यानंतर आता धनंजय मुंडे यांच्या आगामी काळात अडचणी वाढतात का? ते पाहणं महत्त्वाचं आहे. बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी असल्याचं सीआयडीच्या तपासात स्पष्ट झालं आहे. यानंतर आता या प्रकरणात धनंजय मुंडे यांचंदेखील नाव सहआरोपी म्हणून घेण्याची मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे. विशेष म्हणजे धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाकडून एक-दोन नव्हे तर तब्बल 6 वेळा खंडणी मागण्यात आली, असा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे. त्यांनी कोणत्या तारखेला अवादा कंपनीकडे मुंडेंच्या कार्यालायतून मागण्यात आली हे देखील सांगितलं आहे.

    “धनंजय मुंडेंच्या जगमित्र या कार्यालयातून आवादा कंपनीकडे एक-दोन वेळा नाही, तर तब्बल 6 वेळा खंडणी मागण्यात आली, असा आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याने जबाब दिला आहे. पहिल्यांदा 28 ऑगस्ट 2024, दुसऱ्यांदा 11 सप्टेंबर 2024, तिसऱ्यांदा 08 ऑक्टोबर 2024, चौथ्यांदा 19 नोव्हेंबर 2024, पाचव्यांदा 26 नोव्हेंबर 2024, सहाव्यांदा 6 डिसेंबर 2024 या दिवशी खंडणी मागण्यात आली”, असा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे.
    Swargate Rape Case : स्वारगेट बलात्कार प्रकरणातील पीडितेची पुणे पोलीस आयुक्तांकडे मोठी मागणी
    “जर राज्याचा मंत्रीच कंपन्याकडून खंडणी मागत असेल तर राज्यात कंपन्या कशा येतील? हे खूप गंभीर प्रकरण आहे. जर मंत्री आपल्या स्वतःच्या बंगल्यामध्ये बसून खंडणीची सेटलमेंट करत असेल आणि ऑफिसमधून खंडणी मागत असेल आणि त्यातून निरपराध लोकांचे बळी जात असतील तर त्यापेक्षा दुर्दैव काय?” असा सवाल अंजली दमानिया यांनी केला आहे.

    “त्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे. हे गुंड तर दाऊद इब्राहिमच्या दहा पावले पुढे आहेत आणि ही गोष्ट नक्कीच महाराष्ट्रासाठी घातक आहे. अशा प्रवृत्तींना आवर घालणे खूप गरजेचे आहे”, असं रोखठोक मत अंजली दमानिया यांनी व्यक्त केलं आहे.

    पाचेंद्रकुमार टेंभरे

    लेखकाबद्दलपाचेंद्रकुमार टेंभरेपाचेंद्रकुमार टेंभरे, महाराष्ट्र टाइम्समध्ये Videographer आहेत. २००० सालापासून ते पत्रकारितेत आहेत. दूरदर्शनपासून त्यांनी पत्रकारितेला सुरुवात केली. सह्याद्री वाहिनी, साम टीव्ही या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. २०२० पासून ते महाराष्ट्र टाइम्समध्ये आहेत.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed