Anjali Damania on Dhananjay Munde : “धनंजय मुंडेंच्या जगमित्र या कार्यालयातून आवादा कंपनीकडे एक-दोन वेळा नाही, तर तब्बल 6 वेळा खंडणी मागण्यात आली, असा आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याने जबाब दिला आहे”, असा धक्कादायक दावा अंजली दमानिया यांनी केला आहे.
“धनंजय मुंडेंच्या जगमित्र या कार्यालयातून आवादा कंपनीकडे एक-दोन वेळा नाही, तर तब्बल 6 वेळा खंडणी मागण्यात आली, असा आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याने जबाब दिला आहे. पहिल्यांदा 28 ऑगस्ट 2024, दुसऱ्यांदा 11 सप्टेंबर 2024, तिसऱ्यांदा 08 ऑक्टोबर 2024, चौथ्यांदा 19 नोव्हेंबर 2024, पाचव्यांदा 26 नोव्हेंबर 2024, सहाव्यांदा 6 डिसेंबर 2024 या दिवशी खंडणी मागण्यात आली”, असा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे.
Swargate Rape Case : स्वारगेट बलात्कार प्रकरणातील पीडितेची पुणे पोलीस आयुक्तांकडे मोठी मागणी
“जर राज्याचा मंत्रीच कंपन्याकडून खंडणी मागत असेल तर राज्यात कंपन्या कशा येतील? हे खूप गंभीर प्रकरण आहे. जर मंत्री आपल्या स्वतःच्या बंगल्यामध्ये बसून खंडणीची सेटलमेंट करत असेल आणि ऑफिसमधून खंडणी मागत असेल आणि त्यातून निरपराध लोकांचे बळी जात असतील तर त्यापेक्षा दुर्दैव काय?” असा सवाल अंजली दमानिया यांनी केला आहे.
“त्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे. हे गुंड तर दाऊद इब्राहिमच्या दहा पावले पुढे आहेत आणि ही गोष्ट नक्कीच महाराष्ट्रासाठी घातक आहे. अशा प्रवृत्तींना आवर घालणे खूप गरजेचे आहे”, असं रोखठोक मत अंजली दमानिया यांनी व्यक्त केलं आहे.

