Bhai Jagtap on Ganesh Naik : वनमंत्री असलेल्या गणेश नाईक यांना उद्देशून ‘तुम्हाला जंगलात नेऊन सोडलंय’ अशी टिप्पणी करताना आमदार भाई जगताप पाहायला मिळाले.
सुरुवातीपासूनच विरोधकांच्या रडारवर असलेल्या लाडकी बहीण योजनेवरुन आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर निदर्शने करण्यात आली. “लाडक्या बहिणींना फसवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो” अशी घोषणाबाजी विरोधक निदर्शनामध्ये करताना पाहायला मिळाले.
निदर्शने संपवून काँग्रेस नेते भाई जगताप हे मीडिया स्टँडकडे निघालेले होते. तेवढ्यातच वनमंत्री गणेश नाईक यांची एन्ट्री झाली. सध्या गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एकमेकांवरची कुरघोडी चर्चेचा विषय आहे. वनमंत्री असलेल्या गणेश नाईक यांना उद्देशून ‘तुम्हाला जंगलात नेऊन सोडलंय’ अशी टिप्पणी करताना आमदार भाई जगताप पाहायला मिळाले.
Bhai Jagtap : तुम्हाला ‘जंगलात’ नेऊन सोडलंय, ‘वन’मंत्री गणेश नाईकांवर भाई जगतापांची बोचरी टिप्पणी
कदाचित वन खातं गणेश नाईकांना आवडत नसावं, म्हणून भाई जगताप यांनी ही टिप्पणी केली असावी असा कयास लावला जात आहे. वन खातं यापूर्वी अनेकदा विदर्भातल्या नेत्यांना मिळत आलेलं आहे. या पार्श्वभूमीवर भाई जगताप यांनी केलेली टिप्पणी गणेश नाईकांना जिव्हारी लागते की काय? अशी परिस्थिती यावेळी निर्माण झालेली पाहायला मिळाली.
Ganesh Naik : दहिसर-पिंपरीसह १४ गावांचा भार आमच्या करदात्यांनी का सोसायचा? शिंदेंनी दिलेला होकार; नाईकांचा वार, फडणवीसांकडे तक्रार
लाडकी बहीणसाठी किती तरतूद?
दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुमारे २.५३ कोटी लाभार्थी महिलांना जुलै, २०२४पासून आर्थिक लाभ देण्यात येत आहे. त्यासाठी ३३ हजार २३२ कोटी रुपये खर्च झाला आहे. वर्ष २०२५-२६मध्ये या योजनेसाठी एकूण ३६ हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली. तसेच आगामी वर्षात २४ लाख महिलांना लखपती करण्याचे उद्दिष्टही अर्थसंकल्पातून उपमुख्यमंत्री; तसेच अर्थमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले.
Marathi Boy opposed : दादर स्टेशनबाहेर शुभेच्छांचा बोर्ड घेऊन उभ्या मराठी तरुणाला विरोध, प्रख्यात दुकान मालकाने अडवल्याचा आरोप
महायुती सरकारच्या महत्त्वाकांक्षी आणि लोकप्रिय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी किती तरतूद होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागून होते. अजित पवार यांनी आपल्या भाषणात आगामी आर्थिक वर्षासाठी एकूण ३६ हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केल्याचे जाहीर केले. जुलै २०२४पासून आत्तापर्यंत या योजनेवर ३३ हजार २३२ कोटी रुपये खर्च झाले आहेत. या योजनेतून मिळणाऱ्या अनुदानाचा उपयोग काही महिला गटांनी आर्थिक उपक्रमासाठी बीज भांडवल म्हणून केला आहे. अशा गटांना आणखी प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना हाती घेण्याचे विचाराधीन आहे, असे पवार यांनी सांगितले.

