• Sun. Jun 7th, 2026

    आयुध निर्माणी स्फोट प्रकरणात ४ अधिकाऱ्यांवर गुन्हे; निष्काळजीपणाचा ठपका, नऊ कर्मचाऱ्यांनी गमावलेला जीव

    आयुध निर्माणी स्फोट प्रकरणात ४ अधिकाऱ्यांवर गुन्हे; निष्काळजीपणाचा ठपका, नऊ कर्मचाऱ्यांनी गमावलेला जीव

    Bhandara Ordnance Factory Blast: आरएक्स विभागातील एलटीपीई सेक्शनच्या इमारत क्रमांक २३मध्ये असलेल्या एक्सस्ट्रूमिक्स मशीन व त्यातील उपकरणामध्ये बिघाड होत होता. या मशीनच्या दुरुस्तीकडे संबंधित अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष करण्यात आले.

    महाराष्ट्र टाइम्स
    ayudh bhandara balst

    म.टा.प्रतिनिधी, नागपूर: जवाहरनगर आयुध निर्माणीत २४ जानेवारीला झालेल्या स्फोटात नऊ जणांचा मृत्यू झाला. चार अधिकाऱ्यांसह इतरांनी निष्काळजीपणा केल्यानेच हा स्फोट झाल्याचा ठपका ठेवत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

    आरएक्स विभागातील एलटीपीई सेक्शनच्या इमारत क्रमांक २३मध्ये असलेल्या एक्सस्ट्रूमिक्स मशीन व त्यातील उपकरणामध्ये बिघाड होत होता. या मशीनच्या दुरुस्तीकडे संबंधित अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष करण्यात आले. नियमित साफसफाई व देखभालीकडेही दुर्लक्ष केले गेले. प्रशिक्षणार्थींना अतिसंवेदनशील ठिकाण असलेल्या या विभागामध्ये कामाकरिता पाठविल्याचा ठपका चौकशी अहवालात ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या विभागात कर्तव्यावर असलेल्या नऊ कर्मचाऱ्यांच्या मृत्यूस आयुध निर्माणी जवाहरनगरचे ‘सेफ्टी सेक्शन’चे विभागीय अधिकारी देवेंद्र रामदास मिना (४९), मेंटेनन्स विभागाचे ज्युनिअर वर्क मॅनेजर आदिल रशील फारुकी (४६ ), सामान्य प्रशासन विभागाचे संजय सुरेश धपाडे (४४) , सेक्शन प्रभारी अधिकारी आनंदराव मधुकरराव फाये (५०) व आयुध निर्माणी जवाहरनगर व्यवस्थापनातील इतर अधिकारी हे कारणीभूत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
    आम्हाला एक खून माफ करा; रोहिणी खडसेंची राष्ट्रपतींकडे अजब मागणी, नेमकं काय म्हणाल्या त्या? पाहा VIDEO
    या चार अधिकाऱ्यांसह इतरांवर जवाहरनगरचे पोलिस निरीक्षक भिमाजी पाटील (४२) यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला. अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत कुलकर्णी करीत आहेत.
    देवापर्यंत पोहोचण्यासाठी ३०० वर्षांपासून लढा; ‘या’ गावातील १३० कुटुंबांना का नाकारला जातोय मंदिरात प्रवेश?
    कुटुंबीयांची न्यायाची मागणीआयुध निर्माणीतील स्फोटात कर्तव्यावर असलेल्या तेरापैकी मनोज मेश्राम (५५, रा. बेला), अजयकुमार नागदेवे (५१, रा. परसोडी), चंद्रशेखर गोस्वामी (४९ रा. जवाहरनगर), अभिषेक गोपाल चौरसिया (३८, रा. भंडारा), लक्ष्मण केळवदे (४५, रा. जवाहरनगर), धम्मानंद रंगारी (४०, रा. भंडारा), अंकित बारई (२०, रा. साहुली), संजय कारेमोरे (३७, रा. खात, जि. नागपूर), जयदीप बॅनर्जी यांचा मृत्यू झाला होता. यांच्या कुटुंबीयांकडून न्यायाची मागणी होत आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed