• Sat. Jun 13th, 2026
    Mumbai Metro: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! कुलाबा-सीप्झ मेट्रोचा मुहूर्त ठरला, विधानसभेत फडणवीसांनी सांगितली तारीख

    Seepz To Colaba Metro: कुलाबा ते अंधेरी सीप्झ या मेट्रो तीनचे ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. चाचणीही झाली आहे. ही देशातील सर्वांत मोठी मेट्रो रेल्वे आहे’, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

    महाराष्ट्र टाइम्स
    mumbai metro seepz

    मुंबई : ‘मुंबईकरांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या आणि देशातील सर्वांत मोठी भुयारी मेट्रो म्हणून ओळख असणाऱ्या कफ परेड ते सीप्झ मेट्रो रेल्वेसेवा जून, २०२५पासून सुरू होईल’, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. त्याचवेळी राज्यातील इतर मेट्रो प्रकल्प २०२५ ते २०२७ या कालावधीत पूर्ण करण्याचा मानसही त्यांनी बोलून दाखविला.

    राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी वरील माहिती दिली. ‘२०१४ ते २०१९ या काळात दहा मेट्रो मार्गांना मान्यता दिली आहे. आज त्यातील काही मेट्रोमार्ग सुरू झाले आहेत, तर काही अंतिम टप्प्यात आहेत. काहींचे बांधकाम सुरू आहे. कुलाबा ते अंधेरी सीप्झ या मेट्रो तीनचे ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. चाचणीही झाली आहे. ही देशातील सर्वांत मोठी मेट्रो रेल्वे आहे’, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
    पाण्यावरुन लोकल प्रवाशावर कोयत्याने हल्ला; कर्जत-खोपोली दरम्यानची थरारक घटना, नेमकं काय घडलं?
    ‘बाबासाहेबांचे स्मारक ६ डिसेंबर, २०२५पर्यंत’
    इंदू मिलमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी १७२ कोटी रुपये खर्च झाले आहेत. सहाय्यभूत इमारतींचे प्रमुख काम पूर्ण झाले आहे. साडेतीनशे फुटांचा पुतळा निश्चित केला आहे. हा प्रकल्प १ हजार ९० कोटी रुपयांचा आहे. इतर सर्व कामे ६ डिसेंबर, २०२५पूर्वी करण्याचे प्रयोजन आहे. पण तोपर्यंत पुतळ्याचे काम पूर्ण होईल का, याबाबत साशंकता आहे. पण शिल्पकार राम सुतार हे पुतळ्याचे अतिशय चांगले काम करीत आहेत’, अशी माहितीही फडणवीस यांनी यावेळी दिली.
    अबब! ४५ दिवसांत ३० कोटींची कमाई? कोण आहे प्रयागराजचा पिंटू, ज्याचं CM योगी आदित्यनाथ यांनी स्वतः केलं कौतुक
    वीज बिल घटणार
    ‘१०० युनिटपर्यंत वीज वापरणारे ग्राहक राज्यात ७० टक्के म्हणजे दीड कोटी आहेत. त्यांच्यासाठी सोलर योजना आणत आहोत. त्यामुळे या दीड कोटी वीजग्राहकांची वीजबिलातून मुक्तता होणार आहे. दरवर्षी विजेचे दर ९ टक्क्यांनी वाढत असतात. मात्र यावेळी प्रथमच त्यात घट होणार आहे. १०० युनिटपर्यंतच्या ग्राहकांना बिलात २४ टक्क्यांची तर १०० ते ३०० युनिट वापरकर्त्यांना १७ टक्क्यांची घट येणार आहे’, अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत केली.
    राज्यातील कारागृहात ५०० कोटींचा घोटाळा; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांचा आरोप
    ‘शक्तिपीठ महामार्गाला कोल्हापूरमध्ये काहींचा विरोध होता. मात्र कालच मी कोल्हापूरला गेलो होतो. तेव्हा तेथील २०० शेतकऱ्यांनी माझी भेट घेऊन हा महामार्ग हवा असल्याचे १ हजार शेतकऱ्यांचे निवेदन मला दिले’, असे ते म्हणाले.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed