• Fri. Mar 6th, 2026

    Maha Vikas Aghadi : मविआच्या गोटातली मोठी बातमी, उद्धव ठाकरे आणि शरद पवार अ‍ॅक्शन मोडमध्ये, आमदारांची बोलावली बैठक, काय घडतंय?

    Maha Vikas Aghadi : मविआच्या गोटातली मोठी बातमी, उद्धव ठाकरे आणि शरद पवार अ‍ॅक्शन मोडमध्ये, आमदारांची बोलावली बैठक, काय घडतंय?

    Maha Vikas Aghadi Meeting : महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांसाठी उद्या महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. मुंबईत वाय बी चव्हाण सेंटर येथे ही बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याची माहिती आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : विधीमंडळाचं सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसरा दिवस होता. अधिवेशनाचे सुरुवातीचे दिवसच वादळी ठरताना दिसत आहेत. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला. बीड सरपंच हत्या प्रकरणाचे फोटो समोर आल्याने धनंजय मुंडेंना नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा लागला. यानंतर आता येत्या 10 मार्चला अर्थमंत्री अजित पवार हे राज्याचं 2025-26 या आर्थिक वर्षाचं अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या कालावधीत विरोधी पक्ष म्हणून आपली काय भूमिका असावी? याबाबत चर्चा करण्यासाठी महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. ही बैठक आगामी राजकीय घडामोडींसाठी महत्त्वाची मानली जात आहे.

    महाविकास आघाडीची उद्या महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार तर काँग्रेसकडून विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे. महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांना या बैठकीचं निमंत्रण देण्यात आलं आहे. मुंबईत वाय बी चव्हाण सेंटर येथे उद्या संध्याकाळी चार वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.
    Neelam Gorhe : नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात अविश्वासाचा प्रस्ताव, विधान परिषदेचं उपसभापतीपद जाणार?

    बैठकीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार?

    महाविकास आघाडीचे आमदार अनेक दिवसांपासून एकत्र आलेले नाहीत. त्यामुळे या बैठकीच्या निमित्ताने सर्व आमदार एकाच छताखाली आता एकत्र येणार आहेत. या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारला विविध मुद्द्यांवर कसं घेरायचं, सर्वसामान्यांच्या विविध मुद्द्यांसाठी आग्रही राहून योग्य निर्णय घेण्यासाठी सरकारला कसं भाग पाडता येईल? यासाठी रणनीती आखण्याची चर्चा या बैठकीत होऊ शकते.
    Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधीपासून मिळणार? मंत्री आदिती तटकरे यांचं मोठं वक्तव्य
    महाराष्ट्रात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकांचं बिगूल कधीही वाजू शकतं. त्यामुळे वेगवेगळ्या मतदारसंघात स्थानिक पातळीवर काय स्थिती आहे, तिथे स्बळावर निवडणूक लढायची की वेगेवगेळी याबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आमदारांकडून माहिती जाणून घेण्याची शक्यता आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed