Chalisgaon Woman Viral Post : महिलेचा कॅन्सरने मृत्यू झाला. पण त्याआधी तिने महिलांना उद्देशून लिहिलेली एक भावनिक पोस्ट अतिशय व्हायरल झाली आहे. ही पोस्ट वाचून अनेकांनाच्या डोळ्यात पाणी आलं असून हळहळ व्यक्ती केली जात आहे.
२८ वर्षीय प्रतीक्षा पाटील या महिलेचा कॅन्सरने मृत्यू झाला. प्रतीक्षा एमएडीएड झाल्या होत्या. त्या जळगावातील एका प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिका म्हणून काम करत होत्या. वयाच्या २४व्या वर्षी त्यांचं यावल येथील क्लास वन अधिकारी, वनविभागातील वनाधिकारी समाधान पाटील यांच्याशी लग्न झालं होतं.
Mumbai Crime News : मुंबई हादरली! तरुणीवर पेट्रोल टाकत जीवंत जाळलं, रात्रीच्या वेळी घडली भयंकर घटना
नेमकं काय घडलं?
महिलेने तिच्यासोबतचा संपूर्ण प्रसंग लिहित इतर महिलांना आनंदाने जगून घ्या, असा संदेश दिला आहे. पोस्टमध्ये लिहिलंय, की त्यांच्या जीभेवर सुरुवातीच्या काळात छाले झाले होते. त्यावर त्यांनी उपचारही घेतले. तीन महिने झाले उपचार सुरू होते. पण नंतर जीभेला गाठ झाली. तपासात ही गाठ कॅन्सरची असल्याचं समोर आलं.
Pune Crime : बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाल्याचा बनाव, पण वन विभागाच्या तपासात भयंकर समोर; असं समोर आलं पुण्यातील हत्याकांड
८ फेब्रुवारी रोजी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. चार महिने केमोथेरपी, रेडिएशन अशा गोष्टी चार महिने सुरू होत्या. महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॅन्सरमुळे महिलेची जीभ कापण्यात आली. त्यामुळे यापुढे त्यांना कधीही बोलता येणार नव्हतं. या संपूर्ण उपचारादरम्यान त्यांचं १० किलो वजन कमी झालं. मी यातून वाचले हेच घरच्यांसाठी महत्त्वाचं होतं, असे काळीज पिळवटून टाकणारे शब्द महिलेने लिहिले आहेत.
Chalisgaon News: ‘मैत्रिणींनो मस्त जगा, कोणता दिवस शेवटचा असेल…’ मृत्यूपूर्वी विवाहितेची काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट
Raigad News : स्विफ्ट थेट एसटीमध्ये घुसली, ताम्हिणी घाटात भीषण अपघात, मुळशीतील दोघांचा जागीच मृत्यू
आपण ही पोस्ट का लिहितो आहेत, याचं उद्दिष्टही महिलेने सांगितलं. त्यांनी लिहिलं, की आज माझ्याकडे काय नाहीये… गाडी, बंगला, सोनं, नवरा क्लास वन अधिकारी… सगळं आहे, पण मी नसली तर याचा उपयोग काय… आपण स्वत:कडे दुर्लक्ष करतो. मृत्यूच्या दारातून परत येतो, त्याला जीवनाची किंमत कळते. त्यामुळे सगळ्यांनी आपल्याकडे असलेल्या छोट्या गोष्टींमध्ये आनंदी राहा, जीवन जगा, कोणाचा कोणता दिवस आजकाल शेवटचा असेल सांगता येत नाही. तसंच सगळ्यात महत्त्वाचं आपण काय खातोय, याकडेही लक्ष द्या, अशी पोस्ट महिलेने तिच्या मृत्यूच्या काही दिवस आधी केली होती. महिलेवर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर केवळ २० दिवसातच तिचा मृत्यू झाला. या घटनेने, महिलेची व्हायरल पोस्ट वाचून हळहळ व्यक्त केली जात आहे.

