ST Corporation: राज्य परिवहनच्या (एसटी) सुरक्षेची जबाबदारी मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकाऱ्यांकडे असते. मात्र, मागील तीन वर्षांपासून हे अत्यंत जबाबदार पदच गोठवण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
हायलाइट्स:
- ‘स्वारगेट’ बलात्कार प्रकरणानंतर प्रवासी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- सुरक्षेची जबाबदारी मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकाऱ्यांकडे
- पदच अस्तित्वात नसल्याने सुरक्षेचे तीनतेरा
सर्वाधिक ‘लँड बँक’ अर्थात भूपेढी एसटी महामंडळाकडे आहे. मात्र, मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी हे पदच अस्तित्वात नसल्याने त्याचा अतिरिक्त कार्यभार तात्पुरता अन्य अधिकाऱ्यांकडे देण्यात येतो. त्यामुळे प्रवासी आणि मालमत्ता सुरक्षेसाठी अभिनव उपक्रम, प्रयोगात्मक उपाय आदी प्राधान्याने राबवले जात नाहीत. शिवाय, सुरक्षेची धुरा सांभाळणारा अधिकारीच नसल्याने एसटीच्या जमिनींवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
अपुऱ्या सुरक्षा रक्षकांमुळे बसस्थानक, अथवा आगारांमध्ये आलेल्या प्रत्येक बसची नोंदणी होत नाही. बस शेवटच्या थांब्यावर पोहोचल्यावर चालक-वाहकाने ती सोडल्यावर सुरक्षा रक्षकाने बसची दारे-खिडक्या बंद असल्याची खात्री करणे आवश्यक असते. तसेच, बस स्थानक परिसरात फिरणाऱ्या अनोळखी इसमांवर लक्ष ठेवून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची जबाबदारी सुरक्षा रक्षकांकडे असते. मात्र, मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी हे पदच नसल्याने सुरक्षेचे तीनतेरा वाजल्याचे चित्र आहे.
MLC Election : महाराष्ट्रात पुन्हा राजकीय चुरस, विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर, वाचा A टू Z कार्यक्रम
सुरक्षा रक्षकांची संख्याही तुटपुंजी मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकाऱ्याअभावी सुरक्षा रक्षकांची संख्याही तुटपुंजी आहे. एसटीतून रोज सरासरी ५३ लाख प्रवासी प्रवास करतात. महिला सन्मान योजनेमुळे महिलांना सरसकट ५० टक्के तिकीट सवलत आहे. यामुळे महिला प्रवासी संख्या जास्त आहे. तुलनेने महिला सुरक्षा रक्षकांची संख्या नाममात्र आहे.
एसटी महामंडळातील मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारीपद पुन्हा महामंडळात आल्यावर वरिष्ठ भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी गृहविभागाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे.– प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री

