• Mon. Mar 16th, 2026

    अपात्र लाडक्या बहि‍णींवरील कारवाई सैल होण्याच्या चर्चेत उपमुख्यमंत्र्यांनी पुन्हा अट घातली; म्हणाले, ‘गरीब महिलानांच…’

    अपात्र लाडक्या बहि‍णींवरील कारवाई सैल होण्याच्या चर्चेत उपमुख्यमंत्र्यांनी पुन्हा अट घातली; म्हणाले, ‘गरीब महिलानांच…’

    Ajit Pawar on Ladki Bahin Yojana : ज्या कष्टकरी महिला आहेत त्यांनाच लाडकी बहीण योजना गरजेची आहे, असे सूचक वक्तव्य अजित पवारांनी केले आहे. यामुळे येणाऱ्या काळात महायुती सरकार लाडकी बहीण योजनेमधील अपात्र महिलांबाबतही मोठा निर्णय घेणार असल्याचे दिसत आहे.

    Lipi

    धनाजी चव्हाण, परभणी : समाजातला जो वंचित घटक आहे, जो दुर्लक्षित घटक आहे त्याला इतर समाजाबरोबर आणण्यासाठी आम्ही राज्यात लाडकी बहीण योजना आणली. लाडकी बहीण योजनेबद्दल विरोधक टीकाटिप्पणी करत आहेत पण मला सांगायचे आहे की राज्यामधील गरीब महिलांना लाडकी बहीण योजना गरजेची आहे. ज्या मोलमजुरी करतात, ज्या धुणी भांडी करतात, ज्या वेगवेगळ्या घरात जाऊन घर कामे करतात, ज्या महिला कष्टाचं काम करतात, ज्या झोपडपट्टीमध्ये राहतात त्यांनाच ही योजना गरजेची आहे, असे सूचक वक्तव्य अजित पवारांनी केले आहे. यामुळे येणाऱ्या काळात महायुती सरकार लाडकी बहीण योजनेमधील अपात्र महिलांबाबतही मोठा निर्णय घेणार असल्याचे दिसत आहे.

    दरम्यान, आतापर्यंत ९ लाख बहि‍णींवर सरकारने बडगा उगारला आहे. त्यांना योजनेतून वगळण्यात आले आहे. कागदपत्रांच्या छाननी दरम्यान अनियमितता आढळल्याने लाखो बहि‍णींना अपात्र ठरवण्यात आले. यातच लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा ८ वा हफ्ता अद्याप बहिणींच्या खात्यावर जमा झालेला नाही. फेब्रुवारी महिना संपला असला तरी अद्याप पैसे जमा झालेले नाही. फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी ३५०० कोटींच्या चेकवर सही केल्याची माहिती समोर आली. पण अद्यापही पैसे न मिळाल्याने महिला संभ्रमात आहेत.

    उपमुख्यमंत्री अजित पवार आज परभणी दौऱ्यावर होते. परभणी शहरातील १५ माजी नगरसेवकांनी आज अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात र्ला. अक्षय देशमुख यांच्या नेतृत्वात झालेला या पक्ष प्रवेशाच्या सोहळ्याला आमदार नवाब मलिक, आमदार राजेश विटेकर, आमदार विक्रम काळे, आमदार राजू नवघरे यांच्यासह मान्यवर मंडळी उपस्थित होती.

    पुढे बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराला पुढे नेणारा पक्ष आहे. कोणत्याही परिस्थितीत शाहू फुले आंबेडकरांचा विचार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडणार नाही. सध्या मराठवाड्यामध्ये सामाजिक सलोखा बिघडलेला आहे. हा सामाजिक बिघडलेला सलोखा चांगला नाही, तो सुधारण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. सर्व जाती धर्म आणि पंथ यांना सोबत घेऊन आपल्याला पुढे जायचे आहे. आपण महायुतीमध्ये भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्याचे कारण म्हणजे राज्याच्या व्यापक विकासासाठी हा निर्णय घेतला. देशातील अन्य राज्याच्या विकासाबरोबरच महाराष्ट्राचा विकास व्हावा हीच आपली भूमिका आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार सोडणार नसल्याचे जाहीर केले.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *