Ujjwal Nikam on Santosh Deshmukh Murder Case : मी राजकारणात असलो, तरी माझे कर्तव्य आणि ड्युटी यांच्या आड कोणीही आडवं येऊ शकत नाही, असं उज्ज्वल निकम यांनी निक्षून सांगितलं. ते पुण्यात बोलत होते.
उज्ज्वल निकम काय म्हणाले?
बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून माझी नियुक्ती व्हावी, अशी मस्साजोगच्या ग्रामस्थांची मागणी होती. काल त्यांनी अन्नत्याग उपोषणाला सुरुवात केली, हे ऐकून मी खूप व्यथित झालो. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळवलं, की मी हा खटला चालवायला तयार आहे. त्यानुसार यासाठी त्यांनी आज आदेश पारित केले, असं उज्ज्वल निकम म्हणाले.
Pune News : बिल भरलं नाही, पाणी कापू का? पुण्यात ग्राहकांना बनावट मेसेज, फाईल डाऊनलोड करताच बँक खातं रिकामं
मी मुख्यमंत्र्यांचा आभारी आहे. याचप्रमाणे मस्साजोगच्या सर्व ग्रामस्थांना आवाहन करेन, की आपण हे उपोषण सोडावं. कारण या देशात कायदा आणि न्याय सर्वोच्च आहे. आपण असं कोणतंही कृत्य करु नये ज्याने तब्येतीला त्रास होईल. तपास यंत्रणा ज्यावेळी आरोपपत्र दाखल करतील, तेव्हा आम्ही खटला तातडीने चालवायला घेऊ, असं मी तुम्हाला आश्वासन देतो, असंही निकम पुढे म्हणाले.
Maharashtra Politics : पुण्यात शिवसेना वाढवायची, तर भाजपला मीच छुप्या पद्धतीने नडू शकतो; माजी आमदाराचा प्रवेश लांबला, दोन अटींमुळे घोडं अडलं
माझ्या नियुक्तीचे राजकीय पडसाद उमटणार याची मला कल्पना होती. मी मुख्यमंत्र्यांना हे सांगितलं होतं. त्यावेळी त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं होतं, की राजकारणात पूर्वीही विरोधी पक्षांचे अनेक वकील होते. मी आधी राजकारणात अॅक्टिव्ह नव्हतो, पण मी राजकारणात असलो तरी माझ्या कर्तव्यात आणि ड्युटीमध्ये कोणीही आडवं येऊ शकत नाही. मी त्याच जोमाने काम करणार, कोणाच्या विरोधाला मी जुमानत नाही. विरोधासाठी विरोध हा त्यांचा स्थायी स्वभाव झालेला आहे. अजून आरोपपत्रही पाहिलं नाही, त्यानंतरच त्यावर सविस्तर बोलेन, असंही उज्ज्वल निकम म्हणाले.

