• Mon. Jun 8th, 2026
    तुमचं नाव का येतं? बायको-मुलं विचारतात; अंजली दमानियांना उत्तर, पोलीस हवालदाराचे पत्र व्हायरल

    Authored byमानसी देवकर | Contributed byदीपक जाधव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Feb 2025, 3:52 pm

    संतोष देशमुख खून प्रकरणाच्या तपासाबाबत अनेकांकडून शंका व्यक्त केल्या जात आहेत.. यादरम्यान पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नावाने सुद्धा आरोप केले जात आहेत.. यापैकीच एक असलेले पोलीस हवालदार भागवत शेलार यांनी पत्राद्वारे आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.. या पत्रात त्यांनी अंजली दमानिया यांनाही उत्तर दिलंय.. काम करूनही बदनामी मिळाली की काय त्रास होतो हे तुम्हाला कोण सांगणार? असा प्रश्न शेलार यांनी विचारलाय.. इमानदारी केली तिथं कौतुक नाही पण किमान अर्धी माहिती घेऊन मानसिक त्रास देऊ नका अशी विनंती सुद्धा शेलार यांनी केलीय.. .. रोज टीव्हीला नाव येत असल्याने मुलं आणि बायको देखील विचारते तुम्ही काम करता तरीसुद्धा तुमचं नाव टीव्हीला कसं काय येतंय.. गेल्या 75 दिवसात आरोपींना पकडण्यासाठी रानावनात फिरलोत . नदी नाल्यात फिरलो .. काट्या कुपाट्या बघितल्या नाही.. कारण उद्देश एकच होता आरोपींना पकडायचं.. तरीदेखील आरोप होत असल्याने आता मन व्यतीत होतं.. असंही शेलार यांनी आपल्या सोशल मिडियावर लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे..

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed