• Thu. Mar 19th, 2026
    वीज नियामक प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण; म्हणाले, ‘जाणीवपूर्वक चुकीची माहिती …’

    CM Devendra Fadnavis : सौरऊर्जेचा वापर करण्याबाबतचा प्रस्ताव वीज नियामक आयोगाकडे पाठवण्यात आला, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

    Lipi

    नागपूर : सौरऊर्जेचा वापर करण्याबाबतचा प्रस्ताव वीज नियामक आयोगाकडे पाठवण्यात आला आहे. ज्यामध्ये संध्याकाळी ६ ते सकाळी ९ या वेळेत सौरऊर्जेपासून निर्माण होणारी वीज वापरण्यासाठी शुल्क भरावे लागणार आहे, या प्रस्तावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, काही लोक जाणीवपूर्वक लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. घरगुती आणि पीएम सूर्य योजना धारकांना नवीन प्रस्तावाचा कोणताही फटका बसणार नाही.

    नागपूर येथे प्रधानमंत्री किसान सन्माननिधीच्या १९ व्या हप्त्याचे वितरण समारंभ कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले होते. या प्रस्तावाबाबत त्यांना विचारले असता मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, ‘घरगुती वीज ग्राहकांना पीएम सूर्यघर योजना, आठ तासांचा नियम लागू नाही. काही लोक येथे जाणीवपूर्वक चुकीची माहिती पसरवत आहेत. यामध्ये घरगुती सोलर पॅनेल प्रभावी ठरणार नाहीत. याउलट काही उद्योग आमच्याकडे अतिरिक्त वीज तयार होणार आहे, जर ते वापरणार असतील. तर जो काही पैसा आहे तो मिळाला पाहिजे. यासाठी यादृष्टीने प्रपोजल तयार केला आहे.’
    कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना जेल की बेल? आज दिलासा, पण उद्याचं काय? वकिलांनी दिली A टू Z माहिती

    कोल्हापूरचा विरोध पत्करून शक्तिपीठ महामार्ग नाही

    शक्तीपीठ महामार्गाला विरोध आणि समर्थन आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्याने शेतकऱ्यांशी बोलत आहेत. यावर मुख्यमंत्री म्हणाले, ‘कोल्हापूरच्या लोकप्रतिनिधींना कोल्हापूरच्या शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन दिले आहे. शक्तीपीठ मार्ग करा अशा पद्धतीचे निवेदन मला दिले. मुख्यमंत्री पुढे म्हणाले,’ कोल्हापूरचा विरोध पत्करून करणार नाही. तर सगळ्यांना त्याचे फायदे सांगून सगळ्यांना विश्वासात घेऊन तो मार्गाने करणार आहोत.

    दिल्लीतील साहित्य संमेलन राजकीय व्यासपीठ बनल्याची चर्चा रंगली असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयावर भाष्य केले. ते म्हणाले की, साहित्य संमेलनात बोलताना प्रत्येकाने मर्यादा पाळल्या पाहिजेत, विशेषतः साहित्यिकांनी. त्यांनी असेही स्पष्ट केले की, साहित्यिकांना जर वाटत असेल की राजकारण या व्यासपीठावर येऊ नये, तर त्यांनाही पक्षीय राजकीय वक्तव्ये देणे टाळले पाहिजे. साहित्य हा विचार आणि अभिव्यक्तीचा मंच असला तरी त्याला मर्यादेची चौकट असावी, असे मत त्यांनी व्यक्त केले.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed