शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटामध्ये एका पदासाठी दोन मर्सिडीज द्याव्या लागत असल्याचा खळबळजनक दावा केला आहे. या वक्तव्यावर ठाकरे गटाच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त करत जोरदार टीका केली आहे.
२०१९ ला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर आम्हालाही धन्य वाटलं होतं. बाळासाहेबांचा मुलगा मुख्यमंत्री झाला, पण आम्हाला हे माहित नव्हतं की आमदारांनाही भेटी मिळणार नाहीत. कुठल्याच विषयाला भेटी मिळणार नाही, दिवसातून दोन ते तीन वेळा आरटीपीसीआर केली तरी भेट नाही. या गोष्टीचा विचार केल्यावर स्थित्यंतर होतात यामागे अनेक गोष्टी असतात असं नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं.
नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या वक्तव्याची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. यावर ठाकरे गटाच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त करत गोऱ्हेंवर जोरदार टीका केली. मला वाटतं की गोऱ्हे या तीस वर्ष पक्षात राहिलं आहे. मला आता दोन वर्ष झाली, त्यामुळे गोऱ्हे यांनी किती कमावलं असेल असा मला प्रश्न आहे. कारण गोऱ्हे या कोणालाच मातोश्रीवर पडीक असायच्या. त्यांच्याकडे जवळपास सगळ्या नेमणुकींचे अधिकार होते, त्यामुळे किती कमाई झाली हे विचारलं पाहिजे. मातोश्रीवर त्या पडीक असायच्या त्यामुळे त्यांनी किती कमावलं हे बघायला पाहिजे, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, नीलम गोऱ्हे यांनी किती मार्गाने कसा-कसा पैसा जमा केला असेल? पैशाचे स्त्रोत आणि परदेशात कुठे-कुठे प्रॉपर्टी घेतली? त्यांना जाब द्यायला, जाब हा बरोबरीच्या माणसाल द्यावा लागतो. चापलूसी, बदमाशी आणि मर्जी मिळवून जर पद मिळवणरी लोकं असतील तर अशा लोकांवर बोलवून त्यांची उंची वाढवायची नसते, असं म्हणत सुषमा अंधारेंनी उत्तर दिलं आहे.

