Authored byमानसी देवकर | Contributed byपाचेंद्रकुमार टेंभरे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम19 Feb 2025, 5:35 pm
धनंजय मुंडेंची पात्रता नाही, त्यांना कुठलंही मंत्रिपद देऊ नये, असे म्हणत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुंडेंवर सडकून टीका केली आहे. दमानिया यांनी आज (१९ फेब्रुवारी) पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत मुंडेंवर गंभीर आरोप केले आहेत. कॅबिनेट बैठकीत निर्णय झाल्याचं सांगत धनंजय मुंडेंनी 500 आणि 200 कोटींचा जीआर काढला असा आरोप दमानियांनी केला आहे.