• Fri. Mar 13th, 2026

    ‘मराठा आरक्षण मोडीत काढण्यासाठी सरकारचा मंत्र्यांनाच उपोषणाला बसवण्याचा डाव’, मनोज जरांगेंचा गंभीर आरोप

    ‘मराठा आरक्षण मोडीत काढण्यासाठी सरकारचा मंत्र्यांनाच उपोषणाला बसवण्याचा डाव’, मनोज जरांगेंचा गंभीर आरोप

    मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केला आहे. मराठा आरक्षण मोडीत काढण्यासाठी राज्य सरकारमधील 2 मंत्री हे 15 दिवस उपोषणाला बसणार आहेत, असा मोठा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    जालना : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केला आहे. “मराठा आरक्षण मोडीत काढण्यासाठी मंत्र्यांनाच उपोषणाला बसवण्याचा सरकारचा डाव आहे”, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. दोन मंत्रीच उपोषण करणार असल्याचा दावा मनोज जरांगे यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपांना भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मंत्री कधीही आंदोलन करत नाहीत तर जरांगेंचं वक्तव्य निराधार आहे, असं प्रवीण दरेकर म्हणाले आहेत.

    मनोज जरांगे यांचा नेमका आरोप काय?

    “आता सरकार एक आंदोलनच उभं करणार आहे. असं ठरलं आहे की, दोन मंत्री उपोषणाला बसवायचे, राज्यात आता एक आंदोलन सुरु होणार आहे, दोन मंत्री पाठपुरावा करणार. ते बारा-तेरा दिवस आमरण उपोषण करणार आहेत. पाणीही पिणार नाहीत, जेवणार नाहीत. जागा सोडणार नाहीत. त्यांनी मला सांगितलंय. 14 दिवस झाले की आम्हीच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावणार. तसं ठरलंय म्हणे, असं बेगडी आंदोलन करणार”, असा मोठा दावा मनोज जरांगे यांनी केला आहे.

    सुरेश धस-धनंजय मुंडे भेटीवर जरांगे काय म्हणाले?

    “भाजप आमदार सुरेश धस हे मंत्री धनंजय मुंडे यांना दवाखान्यात बघायला गेले. धनंजय मुंडे यांचं एवढं काय दुखत होतं? ते कोमात गेले होते का? ऑपरेशन काय झालं, घरी आल्यावर चांगलं बघत होते म्हणे. ते उघडं पडलं. गुप्त बैठक झाली. तुम्ही इतक्या क्रूर माणसाला भेटायला जाता. त्याच्या लोकांनी खून केलाय. बडा नेता कोण? सांगा. नाव घेत नाही. न्यायालयाच्या पटलावरुन पोलिसांनी सांगितलं आहे की, यातून बड्या नेत्यांना फोन गेले आहेत. सुरेश धस हेच म्हणत होते की, पालकमंत्रीपद 5 वर्षांसाठी विकलं. सुरेश धस त्यांनाच म्हणत होते”, असं मनोज जरांगे म्हणाले.
    उद्धव ठाकरेंनी बाह्या सरसावल्या, संकटात असलेल्या पक्षाला वाचवण्यासाठी डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न, पडद्यामागे हालचाली काय?
    “सुरेश धस यांनी जे करायला नको होतं तेच केलं होतं. त्यांनी जाहीर म्हणायला हवं होतं की, माझ्यावर पक्षाचा दबाव आहे. मला त्याला भेटायला जा असं सांगत आहेत, असं सांगायला हवं होतं. धनंजय मुंडेंना भेट आणि निपटून घे, असं पक्ष सांगत असल्याचं जाहीर करायला हवं होतं. तसेच माझी धनंजय मुंडेंना भेटायची इच्छा नाही, असं स्पष्ट सांगायला हवं होतं. मी आमदारकीचा आणि पक्षासाठी राजीनामा देतोय, असं सांगायला हवं होतं. हे त्यावेळी करायला हवं होतं. आता नाही. आता पुलाखालून भरपूर पाणी गेलंय. सुरेश धस 1 लाख 67 मतांनी पुन्हा निवडून आले असते. आम्ही त्यांना खूप जीव लावला होता”, असंदेखील मनोज जरांगे म्हणाले.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *