Authored byमानसी देवकर | Contributed byपाचेंद्रकुमार टेंभरे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम19 Feb 2025, 8:05 pm
खोटं बोलून धनंजय मुंडे जीआर काढतात, असा हल्लाबोल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलाय. मुंडेंनी कोणत्याही मंत्रिपदावर कधीच बसता कामा नये. त्यांची तेवढी पात्रताच नाही, अशी टीका देखील दमानियांनी केली. तर धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जात नसल्याने यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर देखील निशाणा साधला. सिंचन घोटाळ्याचा उल्लेख करत दमानियांनी अजित पवारांना टोला लगावला.