Authored byसूरज सकुंडे | Contributed byप्रसाद रानडे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम17 Feb 2025, 9:02 pm
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी केलेल्या विधानाची चांगलीच चर्चा होतीये. भारतीय जनता पार्टीला वैभव मिळालं, आम्ही मंत्री झालो हे आमचे श्रेय नाही, त्यासाठी हजारो लाखो कार्यकर्त्यांनी आपलं जीवन पणाला लावलं, असं विधान नितीन गडकरींनी केलंय. या कार्यकर्त्यांना मंत्रिपद मिळाले नाही, आमदारकी मिळाली नाही, खासदारकी मिळाली नाही, महामंडळाचे अध्यक्षपदही मिळाले नाही, परंतु तरीही आपल्या पक्षाकरता कुठलाही विचार न करता, झेंडा खांद्यावर घेऊन हे लोक चालत राहिले. त्या हजारो कार्यकर्त्यांच्या तपस्येतून आणि बलिदानातून मिळालेले हे राज्य आहे, असं म्हणत नितीन गडकरींनी भाजपच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले. नेमकं काय म्हणाले गडकरी? पाहुया…