• Sun. Mar 8th, 2026
    देशमुख प्रकरणाच्या चौकशीवर ग्रामस्थांची हरकत, धनंजय देशमुखांचे भावनिक आवाहन; म्हणाले, ‘तपास यंत्रणांवर अविश्वास…’

    Authored byविमल पाटील | Contributed by दीपक जाधव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 17 Feb 2025, 11:01 pm

    Dhananjay Deshmukh : संतोष देशमुखांचे भाऊ यांनी तपास यंत्रणांवर गंभीर आरोप केला होता. बीडमध्ये पोलिसांचीच टीम बी काम करत असल्याचा मोठा दावा त्यांनी केला. या आरोपांच्या पार्श्वभूमीवर मस्साजोग गावातील ग्रामस्थांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    बीड : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक आरोपी वगळता सर्वांना पोलिसांनी गजाआड केले आहे. न्यायालयाने सर्व आरोपींवर मकोका लावला असून या प्रकरणाची त्रिकोणी चौकशी सुरु आहे. विशेष म्हणजे या प्रकरणासाठी न्यायालयीन समिती स्थापन करण्यात आली आहे. परंतु संतोष देशमुखांचे भाऊ यांनी तपास यंत्रणांवर गंभीर आरोप केला होता. बीडमध्ये पोलिसांचीच टीम बी काम करत असल्याचा मोठा दावा त्यांनी केला. देशमुखांसोतच राजकीय नेत्यांकडूनही आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. यातच मंगळवारी सुप्रिया सुळे मस्साजोग गावात जाऊन देशमुख कुटुंबीयाची भेट घेणार आहोत. त्यापूर्वी आज मस्साजोग गावातील ग्रामस्थांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

    ग्रामस्थांनी आंदोलन केलं की, पोलीस प्रशासन आरोपींना अटक करत आहे. पीआय महाजन यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. आवादा कंपनीची भूमिका देखील अद्याप समोर आलेली नाही, ती भूमिका देखील समोर आली पाहिजे. खंडणी प्रकरणात त्यांनी पण पुरावे प्रशासनाला दिले पाहिजेत. याबाबत एक निवेदन तयार करून गृहमंत्र्यांना देऊ त्यावर ते काय उत्तर देतात ते आम्ही पाहू. आठ दिवसाची मुदत देणार आहोत आणि त्यानंतर आंदोलन करू, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.
    मस्साजोगच्या ग्रामस्थांची आक्रमक भूमिका, थेट मोठा इशारा, गृहमंत्री, मुख्यमंत्री कोणीही असो…
    तर ‘कृष्णा आंधळे सापडण्यासाठी २५ फेब्रुवारीपर्यंत प्रशासनाला मुदत देणार असल्याचे बैठकीत ठरवण्यात आले आहे. असे न झाल्यास राष्ट्रीय महामार्ग अडवून आक्रमक आंदोलन करणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. यावर प्रतिक्रिया देताना मात्र धनंजय देशमुख भावूक झाले आहेत. ते म्हणाले, ‘गावातल्या प्रत्येक व्यक्तीशी न्याय मिळावा ही भावना आहे, याची जाणीव मला आहे. पण मला पोरकं करु नका. आपण सर्व गरीब माणसे आहोत, माझ्यासमोर काहीही बोलण्यासंदर्भात तुम्ही कधी संकोच बाळगू नका.’

    देशमुख म्हणाले, तपास यंत्रणांवर अविश्वास दाखवून चालणार नाही. वाशी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांचा आरोपीला खून झालेला आहे. पण सर्व आरोपी हे पोलीस यंत्रणेसोबत फिरत होते. ६ ते ११ डिसेंबरपर्यंत तपास करून CID कडे वर्ग करण्यात आला आहे. आरोपींनी पोलिसांना ५० पेक्षा जास्त कॉल केले गेले आहेत. आपण पुरावे पुरवणार आहोत, आपल्याला तपास यंत्रणेकडून काम करवून घ्यायचं आहे. त्यामुळे अविश्वास दाखवून जमणार नाही.

    देशमुख पुढे म्हणाले, एकमेकांविषयी कृपया गैरसमज करून घेऊ नका, सर्वांचा उद्देश एकच आहे. प्रत्येक व्यक्तीकडून न्यायाची भूमिका आहे. सुप्रिया सुळे यांना सगळे पॉईंट नोट करून देऊ. मला पोरकं करू नका, कुठलेही आंदोलन करताना चुकीचं पाऊल पडता कामा नये, याची खात्री बाळगली पाहिजे. आपण याच पद्धतीने पुढे गेलो तर आरोपींना फाशी दिल्याशिवाय थांबणार नाही, असा पवित्रा देशमुखांनी घेतला आहे.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed