उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी आज महत्त्वाची बैठक पार पडली आहे. जवळपास दीड तास या बैठकीत मंथन झाल्याची माहिती आहे. राजन साळवी यांच्यानंतर आणखी कोणत्या नेत्याने पक्षाला सोडचिठ्ठी देवू नये या उद्देशाने ही बैठक होती, अशी माहिती आहे.
शिवसेनेची आज दीड तास बैठक पार पडली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार अनिल परब, खासदार अनिल परब, संजय राऊत, माजी खासदार विनायक राऊत उपस्थित होते. पक्षफुटीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची आहे. पक्षाची गळती रोखण्यासाठी ठाकरेंनी ही बैठक घेतल्याची माहिती आहे. या बैठकीनंतर अंबादास दानवे यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली.
अंबादास दानवे बैठकीनंतर काय म्हणाले?
“ही बैठक संघटनेच्या नियमित कामकाजांसाठी होती. कारण लोकसभा निवडणुका झाल्या, त्यानंतर विधानसभा निवडणुका देखील झाल्या आहेत. आमची सदस्य नोंदणी मोहीम सुरु झालेली आहे. यानंतर येणाऱ्या काळात राज्यात संघटनेचं काम मजबूत करण्यासाठी नेत्यांच्या टीमने कशाप्रकारे सक्रीय व्हावं, कशापद्धतीने संघटन व्हावं, या हेतून विचार करण्यासाठी आज संघटनात्मक बैठक होती”, अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिली.
GBS : मोठी बातमी! ‘पाण्यामुळे नाही तर कोंबड्यांमुळे जीबीएसची लागण’, अजित पवार यांच्याकडून महत्त्वाची माहिती
दरम्यान, आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये महापालिका निवडणुका होणार आहेत. मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, ठाणे, कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकांची घोषणा कधीही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत ठाकरे गळाला पक्षगळती ही झेपणारी नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे हे ड्रॅमेज कंट्रोल करण्यात यशस्वी होतात का? ते पाहणं महत्त्वाचं आहे.

