Baramati News : बारामती तालुक्यातील मूर्टी जवळ एक दुर्दैवी घटना घडली आहे. दहावीची परीक्षा आता तोंडावर असल्याने शाळेत दहावीच्या मुलांचा निरोप समारंभ होता. त्यानंतर तीन मुले घरी परतत असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे.
या दुर्घटनेत सोळा वर्षीय प्रतीक अंतू मोरे याचा मृत्यू झाला आहे. तो फलटण मधील साखरवाडी गावचा रहिवासी आहे. त्याबरोबरचे इतर दोन्ही मित्र देखील गंभीर जखमी झाले आहेत. दहावीतील विद्यार्थ्याने जगाचा निरोप घेतल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. पाच दिवसांवर आलेल्या दहावीच्या परीक्षेमुळे वर्गात साऱ्यांचा निरोप घेतला आणि बाहेर पडल्यानंतर त्याने जगाचाच निरोप घेतला अशीच चर्चा सुरू झाली आहे.
आगीच्या घटनांनी महाकुंभात खळबळ, चौथी मोठी दुर्घटना; अनेक मंडप भक्ष्यस्थानी
दहावीच्या निरोप समारंभानंतर अखेर
प्रतीक आणि त्याचे दोन मित्र देवदर्शनासाठी जेजुरीला गेले होते. जेजुरी नंतर मोरगावचे गणपतीचे दर्शन घेऊन ही मुले मोरगाव वरून मूर्टी मार्गे गावाकडे निघाले होते. मूर्टी येथील आश्रम शाळेच्या जवळ आले असता दुचाकी घसरली आणि यात प्रतीकचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेचा पुढील तपास वडगाव निंबाळकर पोलीस करत आहेत.

