• Mon. Mar 9th, 2026
    दहावीचा निरोप समारंभ ठरला अखेरचा, घरी परतताना काळाने गाठलं अन्… गाव हळहळलं

    Baramati News : बारामती तालुक्यातील मूर्टी जवळ एक दुर्दैवी घटना घडली आहे. दहावीची परीक्षा आता तोंडावर असल्याने शाळेत दहावीच्या मुलांचा निरोप समारंभ होता. त्यानंतर तीन मुले घरी परतत असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे.

    Lipi

    दीपक पडकर, बारामती : बारामती तालुक्यातील मूर्टी जवळ एक दुर्दैवी घटना घडली आहे. दहावीची परीक्षा आता तोंडावर असल्याने शाळेत दहावीच्या मुलांचा निरोप समारंभ होता. निरोप समारंभ आटोपला आणि देवदर्शनासाठी सातारा जिल्ह्यातील साखरवाडी येथील तीन मुले पुन्हा परतताना मूर्टी गावाजवळ गाडी घसरली आणि दहावीतला विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर इतर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

    या दुर्घटनेत सोळा वर्षीय प्रतीक अंतू मोरे याचा मृत्यू झाला आहे. तो फलटण मधील साखरवाडी गावचा रहिवासी आहे. त्याबरोबरचे इतर दोन्ही मित्र देखील गंभीर जखमी झाले आहेत. दहावीतील विद्यार्थ्याने जगाचा निरोप घेतल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. पाच दिवसांवर आलेल्या दहावीच्या परीक्षेमुळे वर्गात साऱ्यांचा निरोप घेतला आणि बाहेर पडल्यानंतर त्याने जगाचाच निरोप घेतला अशीच चर्चा सुरू झाली आहे.
    आगीच्या घटनांनी महाकुंभात खळबळ, चौथी मोठी दुर्घटना; अनेक मंडप भक्ष्यस्थानी

    दहावीच्या निरोप समारंभानंतर अखेर

    प्रतीक आणि त्याचे दोन मित्र देवदर्शनासाठी जेजुरीला गेले होते. जेजुरी नंतर मोरगावचे गणपतीचे दर्शन घेऊन ही मुले मोरगाव वरून मूर्टी मार्गे गावाकडे निघाले होते. मूर्टी येथील आश्रम शाळेच्या जवळ आले असता दुचाकी घसरली आणि यात प्रतीकचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेचा पुढील तपास वडगाव निंबाळकर पोलीस करत आहेत.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed