Patra Chawl: आठ वर्षांपासून हक्काच्या घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या रहिवाशांना घरे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या घरांसाठी आठवडाभरात सोडत काढण्यात येणार आहे.
पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प सातत्याने चर्चेत राहिला असून इथल्या रहिवाशांना घरे कधी मिळणार, याची उत्सुकता लागली होती. राज्यात सत्तांतरे होत असताना इथले रहिवासी घरांकडे डोळे लावून बसले होते. आता ही प्रदीर्घ प्रतीक्षा संपुष्टात येत असून, म्हाडाने त्यांच्यासाठी उत्तम दर्जाची घरे बांधली आहेत. या सोडतीत रहिवाशांना कोणत्या मजल्यावर घर मिळणार हे स्पष्ट होणार आहे.
‘मी साधा माणूस, मला हलक्यात घेऊ नका!’ उद्धव ठाकरेंआडून उपमुख्यमंत्री शिंदेंचा भाजपला इशारा
पत्राचाळ प्रकल्पात ६७२ रहिवासी आणि ७२ दुकानांचा समावेश आहे. यातील घरांसाठीची सोडत बाकी होती. हा प्रकल्प १७,४६३ चौ.मी. इतका विस्तृत असून त्यात ४५,२०० चौ.मी. बांधकाम क्षेत्र आहे. इथल्या प्रत्येक सदनिकाधारकांना ६५० चौरस फुटांचे घर आणि ११७ चौ. फुटांची बाल्कनी उपलब्ध होणार आहे. त्यात एकूण ६८६ घरे बांधण्यात आली असून. ६७२ पुनर्वसित घरांचा समावेश आहे. त्यासह दोन सभागृह, एक ध्यानधारणा केंद्र, बगीचा अशी सुविधा आहे.
एअरगनशी मस्ती, अशोक सराफ यांच्या इमारतीला गोळी धडकली, ओशिवऱ्यात काय घडलं?
मुंबई मंडळाला २,७०० घरे
म्हाडाच्या मुंबई मंडळाला पुनर्विकासाअंतर्गत सुमारे दोन हजार ७०० घरे आगामी सोडतीसाठी मिळणार आहेत. या इमारतींतील ३०५ घरांचा समावेश २०१६मधील घरांच्या सोडतीत होता. तसेच, ६७२ मूळ रहिवाशांचाही प्रकल्पात समावेश होता. मात्र, त्यांचे अपूर्ण असलेले काम २०२२मध्ये नव्याने सुरू झाले होते.

